Saturday 8 April 2023

"Paanch sal main Bharat jo hain na pura badalen wala hai boss"

In an episode of Shark Tank, Piyush Bansal listens to the peach standing before him and says 'Paanch sal main Bharat jo hain na pura badalen hai boss. Yeh to clear kar diya hai'

In 2018, two middle-aged men from 'Panchkula' and 'Ludhiana' in Haryana, with no background in IIT/IIM or similar business schools, launched a start-up in the 'Makeup' category. Then came Corona. The business went into a loss. He said that the solution to the loss came out of the creative minds of these two, they implemented it, came out of the loss and the net profit in the last six months was 65 to 70 lakh rupees, he said. They both came with a company valuation of 100 crores. His business head, determination, and genuine Indianness inspired the sharks sitting in front.

And hundreds of such examples appear on the Shark Tank stage. Two girls from Bangalore who are not yet 30 years old came to India after their studies in America. And he started a flower business. Worked on increasing the shelf life of flowers, the flowers like marigold, shevanti, rose, etc. which are used for daily pooja in the deoghar start spoiling in 2-3 days, they invented a technique, and showed that the shelf life of flowers was increased up to 15 days. 1 crore in one month and it came with a valuation of 80 crores.

3 guys from Nashik innovated in electric bikes and made an electric bike-cum-walking shop. Two boys from Kerala have created a device to track the health of their farm animals, from which every ten seconds the data about the health of the cows and buffaloes on their farm is sent to the farmer's mobile app. 4-5 children sitting in Dehradun developed ECG-checking devices like thermometers, or oximeters and made it possible to check their heart activity regularly at home. After a friend's accidental death, guys in Bengal created a smart helmet to instantly know that an accident had occurred. It is planned that in the event of an accident, the helmet can send information from your phone, to the last person you spoke to, or to the nearest hospital by sending a message or phone call.

Piyush Bansal's saying 'Bharat pura badalane wala hai boss' may only apply to businesses, innovative ideas, or unicorn companies. But even common people like us who have been walking consciously and carefully for the last 10 years can see this changing picture clearly.

We (so-called a group of like-minded, relatively young thinkers meaning 'us') realized what the situation was when we started observing with our eyes 10 years ago. Anna Hazare started a movement against corruption in 2012, and Ramdev Baba was also in the same movement. Ten years of UPA government with many parties. Narendra Modi was selected as the party's Prime Minister candidate by the Bharatiya Janata Party in September 2013. And the proliferation of active social media about a year or two before that. Before that there was Orkut, and there was Yahoo Messenger. But social media was not powerful enough to influence national politics. It was created in 2011-12. With the saturation of electronic media on TV and the power of social media that people have come to know, the wonderful phenomenon of 'Bhau Torasekar's blog' has emerged. I'm not talking about Bhau's narrative, but you may remember the year 2013 when Bhau's blog peaked in popularity. 3 blogs per day of 900 to 1000 words. At the time, the Bhau stood against the flow of the established narrative. There was no space for Bhau's narrative on TV, but the overwhelming response the blog received and the impact it had on people made Bhau's narrative take notice in all forms of media.

But do you remember what the established narrative was in 2013?

Talking about Hindutva is like going into the wall and knocking it down. Socialist and communist groups were in majority on social media. Not only on social media but also in the minds of everyone including journalists, intellectuals, academics, columnists, professors, and most importantly MLAs-Khasdars sitting in power, hatred of Hindutva, and appreciation of false secularism. You may remember how much uproar there was when our Seshrao More sir became the president of Vishwa Marathi Sahitya Sammelan in 2015. In 2013, Narendra Modi, the 'main man in the Gujarat riots', will now become the prime minister, his mega-aggressive right-hand man like Amit Shah, who suddenly became the national president of the Bharatiya Janata Party. Today, we can clearly remember the tremendous shock it caused to the established system here. I remember there was a discussion in our study class about how democracy is now under threat due to 'Amit Shah' becoming the national president of a political party. There is no need to use the term so-called progressive today, we have made so much progress. Today people can see clearly like a mirror who is this? Even looking at it in black and white is very dangerous. So when a person who seems to be a good person takes a stance against his political land, he suddenly feels like an enemy. This is starting to happen today.

But think about it, taking a stand against Hindutva in public today is scary. Bollywood used to insult Hindus very easily, today it has taken a leap. How short was this journey?

Needless to say, what was the narrative in India in 2013-14. It will be remembered what prestige 'Hindutva' had at the national level. People were afraid to have any kind of discussion about Islam and Muslims. No one dared to speak publicly about the negative aspects of Mughal history. Talking about the idea of 'Hindutva' in four-fourths was like throwing it into the wall, Ram Temple, Article 370, Common Civil Code, etc. seemed like daydreams and seemed far-fetched. It seemed that the possibility of a viable alternative to the all-India might of the Congress was fading. But the elections were held on the 14 BJP got a thumping majority. BJP alone has 282 seats. And the atmosphere began to change. I am not saying that the environment has started to get better or worse. It is not a value judgment that the environment has changed. But the atmosphere changed. A soft-spoken but academically intelligent Prime Minister was gone and come a man who spoke to people every Sunday and whose degree people still don't know exactly. The communal atmosphere of 2013 was also grim. It was muddy. The highest point of the Sambhaji Brigade. The assassination of Sambhaji Raja According to Manusmriti, the real enemies of Shivaraya were the Brahmins. Shiva Raya's history had no prestige. Celebrating Shiv Jayanti was not a sign of prestige. Today in Maharashtra there is a competition over whose Shiv Jayanti is bigger. Around 13-14, this is the period when children here became aware of the sanctity of forts. From village to village, groups of children were formed who voluntarily went to the forts only to carry out cleanliness drives. Then groups were formed to curb the untoward things happening in the forts. The forts became the couple's point, and the forts became the spots to celebrate the 31st of December. Plans for the restoration of forts went from village to village. Someone voluntarily rebuilt the gate of the fort. Someone did the fencing work. Someone cleaned out the silt that had accumulated in the water tanks for years and found historical documents. And so on. In 2013-14 it was a sin to talk about Shivaji Raj's Hindutva. People almost forgot that Shiv Rai was fighting against Islamic power. Shivarai and Sambhaji Maharaj fought mainly against the Brahmins. And secondly, society doubted Shiva Raya's devotion to Brahmins. Today in the Legislative Assembly, Ajit Pawar said that 'Sambhaji Maharaj does not need to be called a religious hero', but the children of the village rallied against Ajit Pawar. A Bahujan Samaj opposing Ajit Pawar's Shivaji-Sambhaji Maharaj stance is visible in Maharashtra today. People who clearly remember the picture from 10 years ago will clearly see the difference. Aurangabad became 'Chhatrapati Sambhaji Nagar', and people hired cranes with their own money to wipe out wherever 'Aurangabad' was mentioned.

80 MPs are elected from Uttar Pradesh in the 2014 Lok Sabha. At that time news was heard that not a single Muslim MP from Uttar Pradesh went to Lok Sabha in 2014 from BJP. I did not believe the news. But in the 2014 Lok Sabha out of 543 members, a total of 23 MPs were Muslims. In the ruling party, out of 282 BJP MPs, there was not a single Muslim. This meant that the Lok Sabha from 2014 to 2019 was entirely in the hands of those who were Hindus by birth and sympathized with the ideology of Hindutva. Our sir had said, Hindu Rashtra is established. What else do you need?

Two capitals of Maharashtra. One is Mumbai and the other is Nagpur. Two at the two ends of Maharashtra. The most developed cities in Maharashtra in the last fifty years are Pune and Mumbai. Mumbai is the port, the capital city. As Pune was historically important, the IT parks of Hinjewadi or Kharadi gave it more energy. But Vidarbha Marathwada was sidelined from this development. There are thousands of reasons. We should not get involved in politics and selfishness, but why did it take fifty years to realize that there should be such an expressway and to build it? Roads are being built in a hurry, Gadkari is telling his numbers in Lok Sabha, the dates of completion of the work, and the work is being completed on time. The Hinjewadiha area at the northwest end of Pune started to develop as IT parks around 2000. But to go to Hinjewadi from Pune Metro had to come 2021-22!

Once again let's stop by talking about one topic of Hindutva. Ten years ago, Hindutva had no prestige. Today, prestige has been achieved. And today Hindutva has gained so much strength that the behavior of Hindus is going to the other extreme to look like mob rule. An ideology that had no respect in society 10 years ago, today seems to be on the way out of hand. Campaigns like 'No Bindi No Business' or 'unreasonable affection for cows' or 'unnecessary pride in our history' and our feeling are hurting very easily.

Ten years ago, we were fighting to bring dignity to Hindutva, today we are fighting to prevent bad things from happening in Hindutva. We have to oppose mob rule like 'No Bindi No Business', we are struggling to say that mentioning Shivaji alone does not mean that Maharaj is insulted. There is more awareness about 'Islam' than 10 years ago. It goes without saying that Islam, like all other religions, has very serious and undesirable aspects. People have guessed it.

India has come a long way in the last 10 years, from start-ups to political roles. Again I am not making a value judgment. To say that India has come forward with development, we need a lot of data, we need details, and we need to check it properly. We have seen the journey of the last ten years, everyone should do the same evaluation in their own way.

But an honest and down-to-earth businessman Piyush Bansal, who has built his own business with a net worth of Rs 600 crores, says that 'Bharat jo hain na pura badalane wala hai boss' means a lot.

"पाँच साल मैं भारत जो हैं ना पुरा बदलने वाला है बॉस"

शार्क टॅंकच्या एका एपिसोडमध्ये पियुष बन्सल समोर उभ्या असलेल्या पीचरचं सगळं बोलणं ऐकून म्हणतो ‘पाँच साल मैं भारत जो हैं ना पुरा बदलने वाला है बॉस. येह तो क्लीयर कर दिया है’


हरियाणामधल्या ‘पंचकुला’ आणि ‘लुधियाना’ या दोन ठिकाणहून आलेल्या मध्यमवयीन, IIT/IIM किंवा तत्सम बिझनेस स्कुलची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या दोघा पुरुषांनी ‘मेकउप’ या कॅटेगरीमधला स्टार्ट अप सुरु केला २०१८ मध्ये. त्यानंतर कोरोना आला. धंदा लॉसमध्ये गेला. त्यातून या दोघांच्या कल्पक बुद्धीतून लॉसवर उपाय निघाला तो त्यांनी अमलात आणला, लॉसमधून बाहेर आले आणि गेल्या सहा महिन्यातल्या निव्वळ नफा ६५ ते ७० लाख रुपये आहे, असं त्यांनी सांगितलं. १०० कोटींचं कंपनीचं व्हॅल्यूएशन घेऊन ते दोघे आले होते. त्यांचं धंद्याचं डोकं, जिद्द आणि अस्सल भारतीय लहेजा पाहून समोर बसलेले शार्क्स प्रेरित झाले. 


आणि अशी शेकडो उदाहरणं या शार्क टॅंकच्या स्टेजवर दिसतात. बंगलोरच्या अजून वयाची तिशी पार न केलेल्या दोन मुली अमेरिकेतून शिकून आल्या. आणि त्यांनी फुलांचा बिझनेस सुरु केला. फुलांच्या शेल्फ लाईफ वाढवण्यावर काम केलं, झेंडू, शेवंती, गुलाब इत्यादी रोज देवघरात पूजेसाठी लागणारी फुलं २-३ दिवसांत खराब व्हायला सुरवात होते, त्यांनी टेक्निक शोधून काढलं, आणि फुलांची शेल्फ लाईफ १५ दिवसांपर्यंत वाढवून दाखवली. एका महिन्यात १ कोटीचा सेल करून दाखवला आणि ८० कोटी व्हॅल्यूएशन घेऊन त्या आल्या होत्या. 


नाशिकच्या ३ मुलांनी इलेक्ट्रिक बाईकमध्ये इनोव्हेशन करून इलेक्ट्रिक बाईक कम चालतं फिरतं दुकान केलं. केरळमधल्या दोन मुलांनी आपल्या गोठ्यातल्या जनावरांचं आरोग्य ट्रॅक करणारं एक डिव्हाईस तयार केलं, ज्यावरून दार दहा सेकंदाला आपल्या गोठ्यातल्या गाई-म्हशीच्या आरोग्याचा डेटा शेतकऱ्याच्या मोबाईल app वर येतो. डेहराडूनमध्ये बसलेल्या ४-५ मुलांनी थर्मामीटर, किंवा ऑक्सिमीटरसारखं ECG चेक करणारं डिव्हाईस तयार केलं, आणि घरच्या घरी नियमितपणे आपल्या हृदयाची ऍक्टिव्हिटी तपासून बघण्याची सोय केली. बंगालमधल्या मुलांनी आपल्या मित्राच्या अपघाती मृत्यूनंतर, अपघात झालेला आहे हे तात्काळ कळण्यासाठी स्मार्ट हेल्मेट तयार केलं. ते हेल्मेट अपघात झाल्याक्षणी आपल्या फोनमधल्या, ज्याच्याशी सगळ्यात शेवटी बोलणं झालंय त्याला किंवा जवळच्या हॉस्पिटलला मेसेज किंवा फोन पाठवून माहिती देऊ शकेल अशी योजना करून ठेवली. 


पियुष बन्सलचं ‘भारत पुरा बदलने वाला है बॉस’ हे म्हणणं कदाचित फक्त बिझनेसेस, इनोव्हेटिव्ह आयडिया, किंवा युनिकॉर्न कंपन्या या बाबतीतलं असेल. पण गेले १० वर्ष जाणीवपूर्वक आणि डोळसपणे वावरणाऱ्या आमच्यासारख्या सामान्य लोकांना सुद्धा हे बदलत जाणारं चित्र स्पष्ट दिसत आहे. 


आमच्या (असं म्हणतात समविचारी, तुलनेने तरुण विचार करू शकणाऱ्यांचा ग्रुप या अर्थाने ‘आमच्या’) असं लक्षात आलं की १० वर्षांपूर्वी आपण जेव्हा डोळसपणे निरीक्षण करायला लागलो त्या वेळची परिस्थिती काय होती. २०१२ मध्ये अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन उभं केलं, रामदेव बाबाही सारख्याच आंदोलनात होते. दहा वर्षाचं अनेक पक्षांचं कडबोळं असलेलं UPA चं सरकार. नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान म्हणून भारतीय जनता पक्षाने पक्षाचा कँडिडेट म्हणून केलेली निवड २०१३ सप्टेंबरमध्ये. आणि त्याच्या साधारण वर्ष-दोन वर्ष आधी सक्रिय सोशल मीडियाचा प्रसार. त्याआधी ऑर्कुट होतं, याहू मेसेंजर होतं. पण सोशल मीडियाची राष्ट्रीय राजकारणावर प्रभाव टाकू शकेल इतकी ताकद नव्हती. ते २०११-१२ मध्ये निर्माण झाली. टीव्हीवर इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आलेलं सॅच्युरेशन आणि सोशल मीडियाची लोकांना कळलेली ताकद, यातून निर्माण झालेलं ‘भाऊ तोरसेकर यांचा ब्लॉग’ हा अद्भुत फेनॉमेना. भाऊंच्या नॅरेटिव्हबद्दल मी बोलत नाही, पण २०१३ या वर्षात भाऊंच्या ब्लॉगने लोकप्रियतेचा गाठलेला कळस तुम्हाला आठवत असेल. रोजचे ३ ब्लॉग ९०० ते १००० शब्दांचे. त्यावेळी भाऊ प्रस्थापित नॅरेटिव्हच्या प्रवाहाच्या उलटे उभे होते. टीव्हीवर भाऊंच्या नॅरेटिव्हला स्पेस नव्हती, पण ब्लॉग त्याला मिळणारा प्रचंड प्रतिसाद आणि लोकांच्यावर त्यांचा झालेला परिणाम या सगळ्याने भाऊंच्या नॅरेटिव्हची दखल सर्व प्रकारच्या मीडियाला घ्यावी लागली. 


पण २०१३ चं प्रस्थापित नॅरेटिव्ह काय होतं हे आठवतंय का? 


हिंदुत्वाबद्दल बोलणं म्हणजे वाळीत जाऊन पाडण्यासारखं होतं. सोशल मीडियावर समाजवादी, साम्यवादी मंडळी बहुसंख्य होती. केवळ सोशल मीडियावरच नव्हे तर पत्रकार, विचारवंत, अभ्यासक, स्तंभ लेखक, प्राध्यापक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सत्तेत बसणाऱ्या आमदार-खासदारांकसकट सगळ्यांच्या विचारात हिंदुत्त्वाचा द्वेष आणि खोट्या सेक्युलॅरिझमचं कौतुक. २०१५ ला विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आमचे शेषराव मोरे सर झाले त्यावरून ‘एक हिंदुत्ववादी अध्यक्ष झाला’ यावरून किती गदारोळ झाला होता हे आठवत असेल. २०१३ मध्ये नरेंद्र मोदी म्हणजे ‘गुजरात दंगलीमधला मुख्य माणूस’ आता पंतप्रधान होणार का, त्याचा अमित शाह यांच्यासारखा महा-आक्रमक उजवा हात, तो एकदम भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष झाला. त्याचा जबरदस्त धक्का इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला बसलेला आज स्पष्टपणे आठवतोय. आमच्या अभ्यास वर्गात एका राजकीय पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष ‘अमित शाह’ झाला यावरून आता लोकशाही कशी धोक्यात आहे याची चर्चा झालेली मला आठवते आहे. तथाकथित पुरोगामी ही टर्म आज वापरायची गरज वाटत नाही, इतकी प्रगती आपण केली आहे. आज लोकांना आरशासारखं स्पष्ट दिसतं की हा नेमका कोण? हे ब्लॅक अँड व्हाईट करून बघणं सुद्धा खूप धोकादायक आहे. त्यामुळे एरवी चांगला वाटणारा माणूस आपल्या राजकीय भूमीच्या विरोधी भूमिका घेतो तेव्हा अचानक शत्रू वाटू लागतो. हे आज व्हायला लागलं आहे. 


पण विचार करा, हिंदुत्त्वाच्या विरोधात भूमिका घ्यायची आज सार्वजनिक ठिकाणी भीत वाटते. बॉलिवूड खूप सहजपणे हिंदूंचा अपमान करत असे, आज धसका घेतलेला आहे. हा प्रवास किती कमी काळात झाला.


२०१३-१४ च भारतातलं नॅरेटिव्ह काय होतं हे आता वेगळं सांगायची गरज नाही. राष्ट्रीय पातळीवर ‘हिंदुत्वा’ला काय प्रतिष्ठा होती याची आठवण असेल. इस्लाम आणि मुसलमान यांच्याबद्दल कोणत्याही प्रकारच्या चर्चा करायला लोकं घाबरत होती. मुघल इतिहासातल्या अनिष्ट गोष्टी जाहीरपणे बोलण्याची कोणाची छाती नव्हती. ‘हिंदुत्त्वाचा’ विचार चार-चौघात बोलणं म्हणजे वाळीत पाडण्यासारखं होतं, राम मंदिर, कलम ३७०, कॉमन सिव्हिल कोड वगैरे दिवास्वप्नही वाटत असत आणि दुरापास्त वाटत होती. काँग्रेसच्या अखिल भारतीय ताकदीला सक्षम पर्याय उभा राहू शकतो ही शक्यताच धूसर होत चालली आहे असं वाटत होतं. पण १४ च्या निवडणूका झाल्या. थंपिंग मेजॉरिटी भाजपला मिळाली. एकट्या भाजपकडे २८२ सीट्स. आणि वातावरण बदलायला सुरवात झाली. मी वातावरण चांगलं किंवा वाईट व्हायला सुरवात झाली असं म्हणत नाहीये. वातावरण बदललं हे व्हॅल्यू जजमेंट नाही. पण वातावरण बदललं. एक अबोल पण अकॅडमीकली उच्चशिक्षित पंतप्रधान जाऊन, दर रविवारी लोकांशी बोलणारा आणि ज्याच्या डिग्रीविषयी अजूनही लोकांना नक्की माहिती नाही असा माणूस पंतप्रधान झाला. २०१३ चं जातीय वातावरण सुद्धा ग्रीम होतं. गढूळ होतं. संभाजी ब्रिगेडचा सर्वात हाय पॉईंट. संभाजी राजांची हत्या मनुस्मृतीनुसार, शिवरायांचे खरे शत्रू ब्राह्मण. शिवरायांच्या इतिहासाला प्रतिष्ठा नव्हती. शिवजयंती साजरी करणे हे प्रतिष्ठेचं लक्षण नव्हतं. आज महाराष्ट्रात कोणाची शिवजयंती मोठी यावरून स्पर्धा लागते. साधारण १३-१४ हाच काळ आहे जेव्हा इथल्या मुलांमध्ये किल्ल्यांच्या पावित्र्याबद्दल जागृती झाली. गावोगावी मुलांचे ग्रुप तयार झाले जे ऐच्छिकरित्या किल्ल्यांवर केवळ स्वच्छता मोहीम करण्यासाठी जाऊ लागले. मग किल्ल्यांवर घडणाऱ्या अनिष्ट गोष्टींवर आळा घालण्यासाठी गट तयार झाले. किल्ले म्हणजे कपल्स पॉईंट झाले होते, किल्ले म्हणजे ३१ डिसेंबर साजरे करण्याचे स्पॉट्स झाले होते त्यावर बंधनं आली. किल्ल्यांच्या जीर्णोद्धाराच्या योजना गावोगावी निघाल्या. कोणी स्वखुशीने किल्ल्याचा दरवाजा पुन्हा उभा केला. कोणी फेन्सिंगची कामं केली. कोणी वर्षानुवर्षे पाण्याच्या टाक्यांमध्ये साठलेला गाळ साफ केला, त्यात ऐतिहासिक दस्तऐवज सापडले. वगैरे. २०१३-१४ मध्ये शिवाजी राजांच्या हिंदुत्वाबद्दल बोलणं म्हणजे पाप होतं. शिवराय इस्लामी शक्तीविरुद्ध लढत होते ही बाब लोकं almost विसरून गेले होते. शिवराय, संभाजी महाराज लढले मुख्यतः ब्राह्मणांविरुद्धच. आणि दुसरं म्हणजे शिवरायांच्या भक्ती बद्दल समाजाला शंका होती ती ब्राह्मणांच्या भक्तीबद्दल. आज विधानसभेत अजित पवार ‘संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणायची गरज नाही’ अशा आशयाचं बोलले तर गावोगावी मुलांनी अजित पवार यांच्याविरोधात रिल्स केलेत. अजित पवारांच्या शिवाजी-संभाजी महाराजांच्या भूमिकेला विरोध करणारा बहुजन समाज आज महाराष्ट्रात दिसतोय. १० वर्षांपूर्वीचं चित्र स्पष्टपणे आठवत असलेल्या लोकांना हा फरक स्पष्टपणे दिसत असणार. औरंगाबादचं 'छत्रपती संभाजी नगर' झालं, आणि लोकांनी स्वतःच्या पैशाने भाड्याने क्रेन घेऊन जिथेजिथे 'औरंगाबाद' असा उल्लेख आहे तो पुसण्याची मोहीमच हाती घेतली.


२०१४ च्या लोकसभेत उत्तरप्रदेशातून ८० खासदार निवडून जातात. त्यावेळी एक बातमी ऐकली होती की उत्तरप्रदेशातून २०१४ साली भाजपकडून एकही मुसलमान खासदार लोकसभेत गेला नाही. बातमीची शहनिशा मी केली नाही. पण २०१४ च्या लोकसभेत ५४३ च्या लोकसभेत एकूण २३ खासदार मुसलमान होते. सत्तापक्षात म्हणजे भाजपच्या २८२ पैकी एकही खासदार मुसलमान नव्हता. याचा अर्थ २०१४ ते २०१९ ची लोकसभा पूर्णपणे जन्माने हिंदू असणाऱ्या आणि हिंदुत्त्व या विचारधारेबद्दल ज्यांना सहानुभूती आहे अशांच्या हातात होती. आमचे सर म्हणालो होते, झालं की हिंदूराष्ट्र. अजून काय वेगळं पाहिजे? 


महाराष्ट्राच्या दोन राजधान्या. एक मुंबई दुसरी नागपूर. दोन महाराष्ट्राच्या दोन टोकाला. गेल्या पन्नास वर्षांत महाराष्ट्रातली सर्वात जास्त विकसित झालेली शहरं म्हणजे पुणे मुंबई. मुंबई बंदर आहे, राजधानीचं शहर आहे. पुणे ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचं होतंचं, हिंजेवाडी किंवा खराडीच्या आयटी पार्क्स मुळे अजून ऊर्जा मिळाली. पण विदर्भ मराठवाडा या विकासापासून बाजूला पडला. कारणं हजारो असतील. राजकारण आणि स्वार्थ यात आपण जाऊच नये, पण असा एक द्रुतगती रस्ता असावा आणि तो बांधावा हे लक्षात यायला, काम सुरु करायला पन्नासवर्षं का उजाडावी लागली? धडाधड रस्ते बनत आहेत, गडकरी लोकसभेत त्याचे आकडे, काम पूर्ण होण्याच्या तारखा सांगत आहेत, ती काम वेळेत पूर्ण होत आहेत. पुण्याच्या वायव्य टोकाला हिंजेवाडीहा भाग आयटी पार्क्सचा म्हणून विकसित व्हायला सुरवात २००० च्या आसपास झाली. पण पुण्यातून हिंजेवाडीला जायला मेट्रो यावी लागली २०२१-२२! 


पुन्हा एकदा हिंदुत्वाचा एक विषय बोलून पूर्णविराम देऊ. दहा वर्षांपूर्वी हिंदुत्त्वाला प्रतिष्ठा नव्हती. आज प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. आणि आज हिंदुत्त्वाला इतकी ताकद मिळाली आहे की हिंदूंचं वर्तन झुंडशाही वाटावी इतकं दुसऱ्या टोकाला जात आहे. १० वर्षांपूर्वी ज्या विचारधारेला समाजात प्रतिष्ठा नव्हती, ती विचारधारा आज आज हाताबाहेर जाण्याच्या मार्गावर दिसते. ‘टिकली असेल तरच बिझनेस’ किंवा ‘गायीबद्दल वाटणारी अवास्तव आपुलकी’ किंवा ‘आपल्या इतिहासाबद्दलचा अनावश्यक अभिमान’ आणि खूप सहज दुखावणाऱ्या भावना. 


दहा वर्षांपूर्वी हिंदुत्त्वाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आम्ही भांडत होतो, आज हिंदुत्त्वामध्ये अनिष्ट गोष्टी येऊ नयेत म्हणून भांडतोय. 'नो बिंदी नो बिझनेस' सारख्या झुंडशाहीचा विरोध करावा लागतोय, शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला म्हणजे महाराजांचा अपमान होत नाही, हे सांगण्यासाठी धडपडतोय. 'इस्लाम'बद्दल १० वर्षापूर्वीपेक्षा जागृती झालेली आहे. बाकीच्या सर्वच धर्मांप्रमाणे इस्लाममध्येसुद्धा खूप गंभीर आणि अनिष्ट गोष्टी आहेत, हे मुद्दाम सांगायची गरज उरली नाही. लोकांना त्याचा अंदाज आला आहे.


स्टार्ट अप्स पासून - राजकीय भूमिकांपर्यंत गेल्या १० वर्षांत एक प्रवास करून भारत पुढे आला. पुन्हा मी व्हॅल्यू जजमेंट करत नाही. भारत विकास करून पुढे आला असं म्हणायला खूप जास्त डेटा पाहिजे, तपशील पाहिजेत, त्याची नीट चकित्सा केली पाहिजे. गेल्या दहा वर्षातला प्रवास आम्ही पाहिला, त्याच इव्हॅल्युएशन प्रत्येकाने आपापल्या तऱ्हेनं करावं. 


पण स्वतःचा ६०० कोटी नेट वर्थ असलेला धंदा उभा केलेल्या एका प्रामाणिक आणि डाउन तो अर्थ ‘पियुष बन्सल’ या व्यावसायिकाने म्हणावं की ‘भारत जो हैं ना पुरा बदलने वाला है बॉस’ याला खूप मोठा अर्थ आहे.


© मुकुल रणभोर  


Monday 14 November 2022

Moplah Rebellion - An Offshoot of Khilafat Movement | R. C. Majumdar | History and Culture of Indian People (Vol 11, p.360)


The Moplahs are a band of fanatic Muslims, poor and ignorant, about a million in number. They are descended from the Arabs who settled on the Malabar coast, as described above", about the eighth or ninth century A.D. and married mostly Indian wives. They lived in Malabar along with about two million Hindus and had acquired an unenviable notoriety for crimes perpetrated under the impulse of religious frenzy. They were responsible for no fewer than thirty-five outbreaks, of a minor nature, during the British rule. But their most terrible uprising took place in August 1921, and is described in the official report as follows:


"During the early months of 1921, excitement spread speedily from mosque to mosque, from village to village. The violent speeches of the Ali Brothers, the early approach of Swaraj as foretold in the non-co-operating press, and the July resolutions of the Khila fat Conference-all these combined to fire the train. Throughout July and August, innumerable Khilafat meetings were held, in which the resolutions of the Karachi Conference were fervently endorsed. Knives, swords, and spears were secretly manufactured, bands of desperadoes collected, and preparations were made to proclaim the coming of the kingdom of Islam. On August 20, when the District Magistrate of Calicut, with the help of troops and police, attempted to arrest certain leaders who were in possession of arms at Tirurangadi, a severe encounter took place, which was the signal for immediate rebellion throughout the whole locality. Roads were blocked, telegraph lines cut, and the railway destroyed in a number of places. The District Magistrate returned to Calicut to prevent the spread of trouble northwards, and the machinery of Government was temporarily reduced to a number of isolated offices and police stations which were attacked by the rebels in detail. Such Europeans did not succeed in escaping-and they were fortunately few were murdered with bestial savagery. As soon as the administration had been paralyzed, the Moplahs declared that Swaraj was established. A certain Ali Musaliar was proclaimed Raja, Khilafat flags were flown, and Ernad and Walluvanad were declared Khilafat kingdoms. The main brunt of Moplah's ferocity was borne, not by Government, but by the luckless Hindus who constituted the majority of the population...Massacres, forcible conversions, desecration of temples, foul outrages upon women, pillage, arson, and destruction, in short, all the accompaniments of brutal and unrestrained barbarism -were perpetrated freely until such time as troops could be hurried to the task of restoring order throughout a difficult and extensive tract of country.


"As the rebellion had spread over a wide area, the troops available in the Madras District were unable to cope with the situation. and strong reinforcements had to be sent; and by the middle of October, these amounted to four battalions, one pack battery, a section of armored cars, and other necessary ancillary services. As the rebels took to the hills, it was some time before they could be caught in appreciable numbers. By the end of the year 1921, the situation was well in hand, and the back of the rebellion was broken. An idea of the fierceness of some of the fighting may be gained from the night attack at Pandikad, on which occasion a company of Gur khas was rushed at dawn by a horde of fanatics who inflicted some 60 casualties on the Gurkhas and were only beaten off after losing some 250 killed. Throughout the campaign casualties among the Government, troops totaled 43 killed and 126 wounded; while the Moplahs lost over 3,000 killed alone. A great tragedy marked the end of the rebellion. On November 19, 1921, a batch of seventy Moplah prisoners was being conveyed by train, but through the neglect of the guards there was no arrangement for ventilation in the closed coach in which they were put, and all of them died by asphyxiation"


The Muslim leaders put the number of Moplah 'martyrs' as 10,000, and they also referred to the desecration of mosques and other outrages perpetrated by British troops while suppressing the revolt. The main incidents of the Moplah rebellion, particularly the terrible outrages upon a large number of Hindus, such as has been described above in the Government version, have been corroborated by independent testimony. It will suffice to refer to a few documents out of a mass of materials collected on the subject. 


1. A statement signed by the Secretary and the Treasurer of the Kerala Provincial Congress Committee, Secretary, Calicut District Congress Committee, and Secretary, Ernad Khilafat Committee, and K. V. Gopala Menon, refer to the following misdeeds of the Moplahs: "Their wanton and unprovoked attack on the Hindus, the all but wholesale looting of their houses in Ernad, and parts of Valluvanad, Ponnani, and Calicut taluqs; the forcible conversion of Hindus in a few places at the beginning of the rebellion, and the wholesale conversion of those who stuck to their homes in later stages, the brutal murder of inoffensive Hindus, men, women, and children, in cold blood, without the slightest reason except that they are 'Kafirs' or belong to the same race as the policemen, who insulted their Tangals or entered their mosques, desecration, and burning of Hindu temples, the outrage on Hindu women and their forcible conversion and marriage by Moplahs."


The signatories add: "These and similar atrocities (were) proved beyond the shadow of a doubt by the statements recorded by us from the actual sufferers who have survived."41 


2. The memorial of the women of Malabar to Lady Reading contains the following: "It is possible that your Ladyship is not fully apprised of all the horrors and atrocities perpetrated by the fiendish rebels; of the many wells and tanks filled up with the mutilated, but often only half dead, bodies, of our nearest and dearest ones who refused to abandon the faith of our fathers; of pregnant women cut to pieces and left on the roadsides and in the jungles, with the unborn babe protruding from the mangled corpse; of our innocent and helpless children torn from our arms and done to death before our eyes and of our husbands and fathers tortured, flayed and burnt alive; of our helpless sisters forcibly carried away from the midst of kith and kin and subjected to every shame and outrage which the vile and brutal imagination of these inhuman hell-hounds could conceive of; of thousands of our homesteads re duced to cinder-mounds out of sheer savagery and a wanton spirit of destruction; of our places of worship desecrated and destroyed and of the images of deity shamefully insulted by putting the en trails of slaughtered cows where flower garlands used to lie, or else smashed to pieces.... We remember how driven out of our native hamlets we wandered, starving and naked, in the jungles and forests......"42


(This is only a short extract from a long harrowing tale of misery). 


3. Proceedings of the Conference at Calicut presided over by the Zamorin: "Resolution VI. That the Conference views with indignation and sorrow the attempts made in various quarters by interested parties to ignore or minimize the crimes committed by the rebels such as:


(a) Brutally dishonoring women;


(b) Flaying people alive;


(c) Wholesale slaughter of men, women, and children;


(d) Burning alive entire families;


(e) Forcibly converting people in thousands and slaying those who refused to get converted;


(f) Throwing half-dead people into wells and leaving the victims for hours to struggle for escape till finally released from their sufferings by death."


(Two other items refer to looting and desecration of temples as described in the above memorial of the ladies)."


4. A report, dated Calicut, 7 September 1921, published in the Times of India, and another, dated 6 December 1921, published in the New India, give detailed accounts of the most horrible outrages on women which cannot be reproduced for the sake of decency.


5. Sankaran Nair refers to cases of men who were skinned alive or made to dig their graves before being slaughtered.44 


The Congress leaders at first disbelieved the stories, but when hundreds of Hindu refugees arriving at Calicut confirmed the most terrible stories of barbarous and fanatical cruelty, a wave of horror spread among those Hindus who were not blinded by the new-fangled ideas of Hindu-Muslim unity at any cost. Gandhi himself spoke of the "brave God-fearing Moplahs" who were "fighting for what they consider as religion, and in a manner which they consider as religious". Little wonder that Khilafat leaders passed resolutions of congratulations to the Moplahs on the brave fight they were conducting for the sake of religion. Local members of the Congress and Khilafat asked for, and obtained, permission to enter the disturbed area to pacify the Moplahs, but they speedily returned with the admission that they could effect nothing. When truth could not be suppressed any longer and came out with all its naked hideousness, Gandhi tried to conciliate Hindu opinion by various explanations, denials, and censure of the authorities which were crystallized in the following resolution passed by the Congress at Ahmedabad:


"The Congress expresses its firm conviction that the Moplah disturbance was not due to the Non-co-operation or the Khilafat Movement, especially as the Non-co-operation and the Khilafat preachers were denied access to the affected parts by the District authorities for six months before the disturbance, but is due to causes wholly unconnected with the two movements, and that the outbreak would not have occurred had the message of non-violence been allowed to reach them. Nevertheless, this Congress deplores the acts done by certain Moplahs by way of forcible conversions and destruction of life and property, and is of opinion that the prolongation of the disturbance in Malabar could have been prevented by the Government of Madras accepting the proffered assistance of Maulana Yakub Hassan and other non-co-operators and allowing Mahatma Gandhi to proceed to Malabar, and is further of opinion that the treatment of Moplah prisoners as evidenced by the asphy xiation incident was an act of inhumanity unheard of in modern times and unworthy of a Government that calls itself civilised."


This resolution is unworthy of a great political organization which claims to represent India and not any particular community. Its deliberate attempts to minimize the enormity of crimes perpetrated by a band of fanatic Muslims upon thousands of helpless Hindus betrays a mentality which generally characterized Government communiques whitewashing the crimes perpetrated by officials upon the Indians, and both should be strongly denounced by any impartial critic. It is ridiculous to maintain that the Moplah disturbance was not due to the Non-co-operation or Khilafat move ment in the face of well authenticated facts, such as the holding of Khilafat meetings which endorsed the resolutions of the Karachi Conference, the proclamation of Khilafat Kingdoms, and the fly ing of Khilafat flags.45 It is interesting to compare the words of the resolution, almost apologetic in tone, condemning the Moplahs with those which are used against the Government for the faults severe though they were-of some officials.


Mrs. Besant has definitely connected the Moplah rebellion with the Non-co-operation and Khilafat movements, and many other eminent men have expressed similar views. Even Muslim leaders indirectly supported this view. Thus Hazrat Mohani, in his Presi dential speech at the session of the Muslim League held at Ahma dabad on 30 December, made the following observations about the atrocities of the Moplahs:


"The Moplahs justify their action on the ground that at such a critical juncture, when they are engaged in a war against the English, their neighbours (Hindus) not only do not help them or observe neutrality, but aid and assist the English in every way. They can, no doubt, contend that, while they are fighting a defensive war for the sake of their religion and have left their houses, property and belongings and taken refuge in hills and jungles, it is unfair to characterise as plunder their commandeering of money, provisions and other necessaries for their troops from the English or their supporters."


In characterising the Moplah action as a religious war against the British, Hazrat Mohani definitely regards it as a political move ment which cannot be dissociated from the Khilafat agitation. His justification of the atrocities of the Moplahs is not only puerile in the extreme but is directly contrary to facts. He ignores the patent fact that in the majority of cases, the almost wholesale looting of Hindu houses in portions of Ernad, Valluvanad and Ponani taluqs was perpetrated on the 21st, 22nd and 23rd of August, before the military had arrived in the affected area, i.e. long before the Moplahs had taken themselves to hills and jungles.


By its attitude towards the Moplah outrages the Congress for feited its moral right to criticize the action of the British authorities in respect of the outrages in the Punjab. Gandhi's ejaculations about the "God-fearing Moplahs" and the congratulations showered on them by the Congress and Muslim leaders, like O'Dwyer's tele graphic approval of Dyer's action, might have been due to igno rance of all the facts, but even when these were fully known, they did not repudiate their original views.


At the annual session of the Khilafat Conference at Cocanada held in 1923, when all the woeful tales of barbarous outrages com mitted by the Moplahs were widely known all over the country, the great national leader, Shaukat Ali, President of the session, moved a resolution for the provision of Moplah orphans and fami lies. "Thousands of Moplahs", he said, "had been martyred but they owed a duty, both on religious and humanitarian grounds, to these brave Moplahs". While conceding that some Hindus had suffered at the hands of the Moplahs, he said the whole chapter was a closed book to them; but they had a duty to the brave Mop lahs. He announced that he and his brother Muhammad Ali would each provide for the maintenance of one Moplah orphan.


Member after member rose to narrate the sufferings that the Moplahs had suffered in the hands of the Government, but there was no reference to the inhuman barbarities committed by them. The Khilafat Conference adopted the Resolution moved by Shau, kat Ali and funds were collected for the maintenance of the Mop lah orphans. One looks in vain for a similar action on the part of the Congress or Hindu leaders to help the victims of the Moplah outrage. 


VIII. GENERAL REVIEW


The question has often been discussed whether the Non-co operation movement launched by Gandhi in 1920-1 was a success or failure. Perhaps the correct view would be that it was neither a complete success nor a complete failure, and the truth, as often happens, lies between the two. People have argued that it must be regarded as a failure because it failed to achieve any of the three objects for which it was undertaken. The wrongs done to the Khilafat or the Punjab were not remedied, and the 'Swaraj within a year', promised by Gandhi, was as far off as ever. Nor did any conspicuous success attend the efforts to achieve the speci fic objects immediately in view. The boycott of Councils, law courts, and educational institutions proved ineffective, and that of liquor and foreign goods had only a limited and temporary success, due to active picketing. As regards the constructive programme the only visible effect was the revival of the spinning wheel, though its popularity did not last very long, and it survives today primarily as a ritual to be observed on the anniversary of the birth and death of Mahatma Gandhi,


But even admitting all this, it is difficult to concede that the Non-co-operation movement was a failure. The Civil Disobedience Enquiry Committee, set up by the All-India Congress Committee and consisting of such eminent men as Motilal Nehru, C. Raja gopalachari, M. A. Ansari, V. J. Patel and Kasturiranga Aiyangar, with Hakim Ajmal Khan as Chairman, made an extensive tour al most all over India and received written replies to their question naire from 459 witnesses, of whom 366 were also orally examined. They made a general review of the success and failure of the Non co-operation movement, item by item, and much of what has been written above on this subject is based on their report. Even mak ing due allowance for the fact that the members were' all Congress leaders responsible for the movement and, as such, would be natu rally inclined to exaggerate its good and minimize its evil, there seems to be a great deal of truth in the following passage in their Report:


"Witnesses from all parts of the country speaking from direct local knowledge have testified to the outstanding features of the crisis through which the country is passing. These are: (1) the general awakening of the masses to their political rights and pri vileges, (2) the total loss of faith in the present system of Govern ment, (3) the belief that it is only through its own efforts that India can hope to be free, (4) the faith in the Congress as the only orga nisation which can properly direct national effort to gain freedom, and (5) the utter failure of repression to cow down the people. Our own personal observation in the course of our tour round the whole country fully corroborates the evidence on these points. We have found the general population permeated with the indomitable spirit of a great national awakening unprecedented in the history of the human race for its wide sweep and rapid growth. The great bulk of the people showed complete lack of confidence in the Govern ment and were found to be firm believers in Non-co-operation and all that it stands for. Repression, where it had done its worst, had no doubt left behind it a trail of sorrow and suffering, but failed to crush the spirit of the people."


Although stated with some amount of pardonable exaggera tion, the claims made by the Congressmen, as expressed in the above passages, cannot be lightly brushed aside. Even the Govern ment was forced to admit that in spite of its impracticable nature, the Non-co-operation movement was engineered and sustained by nationalist aspirations. In the statement submitted to the Parlia ment, the Government of India made the following observations regarding the general results of the Non-co-operation movement:


"But when we turn to consider the campaign as a whole, it would be idle to assert that it was infructuous. Whether the re sults obtained are desirable or undesirable will be demonstrated beyond all possibility of doubt by the passage of time. But that these results are real is no longer open to question. Mr. Gandhi's intensive movement during the years 1921 and 1922 has diffused far and wide, among classes previously oblivious to political con siderations, a strong negative patriotism born of race hatred of the foreigner. The less prosperous classes both in the town and the countryside have become aroused to certain aspects-even though these be mischievous, exaggerated and false of the existing poli tical situation. On the whole, this must be pronounced, up to the present, the most formidable achievement of the non-co-operation movement. That it has certain potentialities for good will be main tained by many; that it will immensely increase the dangers and difficulties of the next few years can be denied by few."46


Making necessary allowance for a foreign Government's view about what constitutes true patriotism, and what is mischievous, on the part of the Indians, the above lines may justly be regarded as an indirect admission of the great success of the Non-co-operation movement.


An eminent leader of the Moderate party, who characterizes the Report of the Enquiry Committee as a one-sided document, has presented his "non-partisan conclusions" on the subject.47 Though his claims to be a 'non-partisan' may justly be challenged, it is inte resting to note that his conclusions do not materially differ from what has been stated above regarding the success or failure of the different items on the basis of the Committee's Report. It is also deserving of notice that the Committee itself admitted the failure of the movement in a manner which a 'partisan' committee has seldom done or is likely to do in future.


The most outstanding feature of the Non-co-operation move ment was the willingness and ability of the people in general to endure, to a remarkable degree, hardships and punishments inflicted by the Government. This is the reason why though the Non-co-operation movement collapsed, the memory of its greatness survived, and was destined to inspire the nation to launch it again at no distant date. For, the movement proved to be a bap tism of fire which initiated the people into a new faith and new hope, and inspired them with a new confidence in their power to fight for freedom. Anyone who reviews the whole course of events during the movement must be struck with two undeniable facts. First, that the Congress had, for the first time, become a really mass movement in the sense that national awakening had not only penetrated to the people at large but also made them active parti. cipants in the struggle for freedom. The second, which is no less important, but was generally ignored at the time, is that the Indian National Congress was, almost overnight, turned into a genuine revolutionary organization. It was no longer a deliberative assemb ly but an organized fighting force, pledged to revolution. Its wea pons were different, but its aims, objects, and temperament close ly resembled those of militant nationalism. But there were two significant differences. Unlike the latter the Congress did not work in secret, and its non-violent creed and method had the full sympathy and active support of the people at large. These two features were the greatest contributions of Mahatma Gandhi to India's struggle for freedom. 


Cf. the Official Report, quoted above on pp. 360-61. According to a Confidential Report of the Intelligence Bureau, prepared by P.C. Bamford, Deputy-Director, Intelligence Bureau, Home Department, Government of India, "The Moplah re- bellion broke out in August after Khilafat agitators, including Abul Kalam Azad and Hakim Ajmal Khan, had been making violent speeches in that area. Ever since the Majlis-ul-Ulema Conference at Erode in April, the feelings of the Moplahs had been steadily growing with respect to Khilafat, while the non- violent Non-co-operation movement was receding more and more into the back- ground." For further extracts from this Report containing anti-Hindu senti- ments of the Moplahs, cf. Freedom-India, III. pp. 831-2, footnote, 85 a.


मोपला बंड-खिलाफत चळवळीचा एक भाग


मोपला हे धर्मांध मुस्लिम, गरीब आणि अज्ञानी, सुमारे दहा लाख लोकांचा समूह आहे. ते वर वर्णन केल्याप्रमाणे मलबार किनार्‍यावर स्थायिक झालेल्या अरबांचे वंशज आहेत, इसवी सन पूर्व आठव्या किंवा नवव्या शतकात आणि त्यांनी बहुतेक भारतीय (एतद्देशीय) स्त्रियांशी लग्न केली. ते मलबारमध्ये सुमारे वीस लाख हिंदूंसह राहत होते. गुन्हेगारीमुळे त्यांना अवास्तव कुप्रसिद्धी मिळाली होती. ब्रिटिश राजवटीत धार्मिक उन्मादाच्या किरकोळ स्वरूपाच्या पस्तीस पेक्षा कमी उद्रेकांसाठी ते जबाबदार होते. परंतु त्यांचा सर्वात भयानक उठाव ऑगस्ट, 1921 मध्ये झाला आणि अधिकृत अहवालात खालीलप्रमाणे वर्णन केले आहे. :

"1921 च्या सुरुवातीच्या महिन्यांत, मशिदीमशिदीमधून, गावागावांमधुन उद्रेकाचं लोण पेटत गेलं. अली बंधूंची हिंसक भाषणे, असहकाच्या पात्रांमधून भाकीत केल्याप्रमाणे स्वराज्याचा प्रारंभिक दृष्टिकोन आणि खिलाफत परिषदचे जुलैचे ठराव  - या सर्वांनी एकत्रितपणे आग भडकवण्याचं काम केलं. संपूर्ण जुलै आणि ऑगस्टमध्ये, असंख्य खिलाफत बैठका झाल्या, ज्यामध्ये कराची परिषदेच्या ठरावांना उत्स्फूर्तपणे मान्यता देण्यात आली. चाकू, तलवारी आणि भाले गुप्तपणे तयार केले गेले, उठावाच्या तयारीसाठी अनेक टोळ्या गोळा तयार झाल्या. आणि इस्लामचे राज्य येण्याची घोषणा करण्याची तयारी करण्यात आली. 20 ऑगस्ट रोजी, कालिकतच्या जिल्हा दंडाधिकार्‍यांनी, सैन्य आणि पोलिसांच्या मदतीने, तिरुरंगडी येथे शस्त्रास्त्रे बाळगणार्‍या काही नेत्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा एक तीव्र चकमक झाली. ही चकमक म्हणजे त्या सर्व भागात मोठ्या प्रमाणावर उठाव करण्याचा संकेत होता. त्यानंतर अनेक ठिकाणी रस्ते अडवले गेले, टेलिग्राफ लाईन कापल्या गेल्या आणि अनेक ठिकाणी रेल्वेचे डबे उद्ध्वस्त करण्यात आले. हे लोण उत्तरेकडे पसरू नये म्हणून जिल्हा दंडाधिकारी कालिकतला परतले आणि बंडखोरांनी हल्ले केलेल्या अनेक कार्यालये आणि पोलिस ठाण्यांवर सरकारी यंत्रणा तात्पुरती कमी करण्यात आली. काही युरोपीय लोकांना या हल्ल्यातून यशस्वीपणे निसटून जाता आलं नाही, त्यांची अमानवी क्रौर्याने हत्या करण्यात आली. सुदैवाने असे लोकं संख्येने कमी होते. प्रशासनाच्या हालचाली थांबल्या आहेत आणि प्रशासनाकडून आता कोणताही प्रतिकार होणार आंही हे कळताच मोपला बंडखोरांनी  स्वराज्य स्थापन झाल्याचे जाहीर केले. एका ‘अली मुसलियार’ या व्यक्तीला राजा घोषित करण्यात आले, खिलाफतचे झेंडे फडकवले गेले आणि एर्नाद आणि वल्लुवानद यांना खिलाफत राज्य घोषित करण्यात आले. मोपलांच्या क्रूरतेचा मुख्य फटका सरकारला नव्हे, तर बहुसंख्य लोकसंख्येचा भाग असलेल्या दुर्दैवी हिंदूंनी सहन केला... नरसंहार, बळजबरीने धर्मांतरे, मंदिरांची विटंबना, स्त्रियांवर अत्याचार, लुटालूट, जाळपोळ आणि विध्वंस. थोडक्यात, देशाच्या या भागातील कठीण आणि बिकट परिस्थिती ताब्यात आणून शांतता निर्माण करण्यासाठी जोपर्यंत बाहेरून सैन्य आलं नाही तोपर्यंत क्रूर आणि अमानवी  रानटीपणाला बळी पडले मुख्यतः हिंदू.”


"बंडखोरांच्या ताब्यात मोठा प्रदेश असल्यामुळे, मद्रास जिल्ह्यात उपलब्ध सैन्य परिस्थितीला तोंड देऊ शकले नाही. आणि परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी मोठ्या संख्येने सैन्यबळ पाठवावं लागलं.  आणि ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत, त्यांची चार बटालियन, एक पॅक बॅटरी, चिलखती गाड्यांची एक तुकडी आणि इतर आवश्यक सहायक सेवा पाठवण्यात आल्या. पण बंडखोरांनी टेकड्यांचा आश्रय  केल्यामुळे, मोठ्या संख्येने बंडखोर प्रशासनाच्या ताब्यात येण्यासाठीही वेळ लागला. 1921 च्या अखेरीस परिस्थिती वर नियंत्रण मिळवता आलं आणि त्यानंतर बंडाची तीव्रता कमी झाली. पंडिकड येथे एका रात्री झालेल्या हल्ल्यावरून या लढाईच्या भीषणतेची कल्पना येऊ शकते. त्या प्रसंगी धर्मांधांच्या जमावाने पहाटेच्या वेळी गोरखा बटालियनवर हल्ला केला. त्या हल्ल्यात सुमारे 60 गोरखा सैनिक ठार झाले. जेव्हा अंतिमतः धर्मांधांच्या या जमावाचा पूर्ण पराभव झाला तेव्हा सुमारे अडीचशेहुन अधिक गोरखा मारले गेले होते. संपूर्ण मोहिमेदरम्यान, एकूण सरकारी अधिकाऱ्यांपैकी  43 लोक मारले गेले आणि 126 जखमी झाले; तर  3,000 हून अधिक मोपला बंडखोर मारले. मात्र बंडाचा अंत झाल्याची एक मोठी शोकांतिका झाली होती. 19 नोव्हेंबर 1921 रोजी सत्तर मोपला कैद्यांची तुकडी रेल्वेने जात होती, परंतु रक्षकांच्या दुर्लक्षामुळे त्यांना ज्या बंद डब्यात ठेवले होते त्यामध्ये वेंटिलेशनची व्यवस्था नव्हती त्यामुळे त्या सत्तर कैद्यांचा गुदमरून मृत्यू झाला.”


मुस्लिम नेत्यांनी मोपला शहिदांची संख्या 10,000 इतकी नोंदवली आहे आणि त्यांनी बंड दडपताना ब्रिटीश सैन्याने केलेल्या मशिदींची विटंबना आणि इतर हिंसक कृत्यांचा उल्लेख केला. पण मोपला बंडाचे मुख्य बळी ठरले विशेषत: हिंदू. मोठ्या संख्येने हिंदूंवरील भयंकर अत्याचार. त्यांच्या नोंदी  वर वर्णन केल्याप्रमाणे सरकारी डॉक्युमेंट्समध्ये तर आहेतच, त्यांच्याशिवाय स्वतंत्र पणे काही लोकांच्या साक्षींनी सुद्धा त्यांची पुष्टी केली आहे. या विषयावर गोळा केलेल्या अनेक दस्तऐवजांपैकी काही कागदपत्रांचा आढावा घेणे गरजेचे आहे. 


1. केरळ प्रांतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आणि कोषाध्यक्ष, कालिकत जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव आणि एर्नाद खिलाफत कमिटीचे सचिव आणि के. व्ही. गोपाला मेनन यांनी स्वाक्षरी केलेले निवेदन, मोपलांच्या खालील दुष्कृत्यांचा संदर्भ देते: "त्यांची इच्छाशक्ती आणि हिंदूंवर विनाकारण केलेला हल्ला, एर्नाड आणि वल्लुवनद, पोन्नानी आणि कालिकत तालुक्यांतील त्यांच्या घरांची सरसकट लूट. बंडाच्या सुरुवातीला काही ठिकाणी हिंदूंची जबरदस्तीने धर्मांतरं केली गेली. आणि बंडाच्या नंतरच्या टप्प्यात जे दुर्दैवाने आपापल्या घरी अडकले त्यांचं घासरसकट धर्मांतरं करण्यात आली. ते काफिर आहेत, किंवा पोलीस यंत्रणा ज्या वंशाची आहे त्या वंशाचे आहेत एवढ्या कारणासाठी सनी दुसरं काहीही कारण नसताना निष्पाप हिंदू पुरुष, स्त्रिया आणि लहान मुलांची अतिशय जाणीवपूर्वक निर्घृण हत्या केल्या गेल्या. हिंदू मंदिरांची विटंबना आणि जाळपोळ, हिंदू स्त्रियांवर अनन्वित अत्याचार आणि त्याची परिणीती मोपलांद्वारे त्यांचे जबरदस्तीने धर्मांतर आणि अंतिमतः त्यांच्याशी विवाह."


के. व्ही. गोपाला यांनी नोंदवलं आहे की, हे आणि यासारखे अत्याचार ज्यांच्यावर झाले अशा लोकांशी आम्ही बोलले, ज्यांना या प्रकारचे अत्याचार सहन करावे लागले त्यांच्याशी झालेल्या संवादातून हिंदूंवर अनन्वित अत्याचार झाले आहेत याबद्दल शंकेचं लवलेश उरलेला नाही. 


मलबारच्या एका स्त्रीने त्यावेळच्या भारताच्या गव्हर्नरच्या पत्नी लेडी रिडींगला लिहिलेल्या पत्रांत पुढील नोंद आहे. 


"हे शक्य आहे की तुम्हाला दुष्ट बंडखोरांनी केलेल्या भयंकर आणि अत्याचारांची पूर्णपणे माहिती नाही; ज्यांनी आमच्या वाडवडिलांच्या धर्म सोडण्यास नकार दिला अशा आमच्या जवळच्या लोकांचे आणि प्रियजनांचे अनेकदा अर्धमेले किंवा कधी मृतदेह विहिरीत किंवा तलावात टाकून दिले गेले. गरोदर स्त्रियांचे तुकडे तुकडे करून जंगलात रस्त्याच्या कडेला टाकून दिले. आयांच्या मृतदेहातून न जन्मलेल्या निष्पाप बाळांना आम्हाला बाहेर काढावं लागलं. आमच्या निष्पाप आणि असहाय्य मुलांना आमच्या हातातून हिसकावून घेऊन आमच्या डोळ्यांसमोर मारले गेले. आमचे पती आणि वडिलांचा अनन्वित छळ करून शेवटी त्यांना जिवंत जाळण्यात आलं; आमच्या असहाय्य बहिणींना बळजबरीने सर्वासमोर नेले गेले आणि कोण्याही सहृदय माणसाला लाज वाटेल अशी कृत्य केली. त्या अमानवी, नीच आणि क्रूर कृत्यांची आपण कल्पना ही करू शकणार नाही, पण ते आमच्या मुलींशी घडलं. निव्वळ रानटीपणामुळे आणि विनाशाच्या दुर्दम्य भावनेतून हजारो घरे आज जमीनदोस्त झालेली आहेत.; आपल्या जागेवर पूजेची विटंबना व नासधूस केली गेली. जिथे फुलांचे हार पडत असत तिथे कत्तल करूनगोमांस टाकून आमच्या देवदेवतांचा आणि प्रतिमांचा अपमान केला गेला. आज आठवणी फक्त याच शिल्लक आहेत की कसं आम्ही आमच्या मूळ गावांतून बाहेर फेकले गेलो, उपाशी आणि नग्न, जंगलात भटकत राहिलो."

अत्याचाराचं वर्णन करणाऱ्या एका दीर्ध पात्रातील हा केवळ एक उतारा आहे. 


कालिकत येथील परिषदेची कार्यवाही झामोरिन यांच्या अध्यक्षतेखाली झाली: "ठराव VI. बंडखोरांनी केलेल्या गुन्ह्यांकडे दुर्लक्ष करण्यासाठी किंवा त्यांची तीव्रता कमी करण्यात स्वारस्य असलेल्या पक्षांनी विविध स्तरांत केलेल्या प्रयत्नांबद्दल परिषदेला संताप आणि खेद वाटतो, ते गुन्हे असे की : 


(१) क्रूरपणे स्त्रियांचा अपमान करणे; (Brutally dishonouring women

(२) लोकांना जिवंत जाळणे;


(३) पुरुष, स्त्रिया आणि मुलांची सरसकट कत्तल;

(४) कुटुंबच्या कुटुंब पेटवून देणे;

(५) हजारोंच्या संख्येने लोकांना जबरदस्तीने धर्मांतरित करणे आणि ज्यांनी धर्मांतर करण्यास नकार दिला त्यांची हत्या करणे;

(६) अर्धमेले लोकांना विहिरीत फेकून देणे आणि जोपर्यंत शेवटी मृत्यूने त्यांची सुटका होत नाही तोपर्यंत बळी पडलेल्यांना तासनतास तडफडवत ठेवणे. 

याशिवाय मंदिरांचा विध्वंस आणि जाळपोळ या गोष्टी आहेतच. 


4. कालिकतयेथे 7 सप्टेंबर 1921 रोजी टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या, आणि दुसरा, 6 डिसेंबर 1921 रोजी, न्यू इंडियामध्ये या अत्याचारांचे वर्णन करणारे अहवाल प्रसिद्ध झाले होते. त्यामध्ये स्त्रियांवरील अत्यंत भयंकर अत्याचारांची तपशीलवार माहिती दिलेली आहे, ते अत्याचार पुन्हा शब्दांत मांडताना सुद्धा त्रास होत आहे, आणि स्त्री जातीचा भयंकर अपमान पुन्हा शब्दांतही होऊ नये यासाठी तो इथे देत नाही. 


शंकरन नायर असे काही संदर्भ देतात जिथे पुरुषांच्या कत्तल करण्यापूर्वी त्यांची जिवंतपणी कातडी सोलली गेली किंवा त्या पुरुषांना स्वतःच्या कबरी खोदायला लावल्या. 

काँग्रेसच्या नेत्यांनी सुरुवातीला या कथांवर विश्वास ठेवला नाही, परंतु जेव्हा शेकडो हिंदू निर्वासितांनी कालिकतला पोचलेल्या क्रूर आणि धर्मांध क्रूरतेच्या भयंकर कथांना पुष्टी दिली, तेव्हा कोणत्याही किंमतीवर हिंदू मुस्लिम ऐक्याच्या कल्पनेने आंधळे झालेल्या हिंदूंमध्ये एक दहशतीची लाट पसरली. 


गांधींनी स्वतः "ईश्वराला घाबरणारे शूर मोपला" असा मोपला बंडखोरांचा गौरव केला होता. आणि त्यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले होते "ते ज्याला धर्म मानतात आणि ज्याला ते धार्मिक मानतात त्यासाठी लढत होते". खिलाफतच्या नेत्यांनी मोपलांच्या धाडसी लढ्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचे ठराव पास केले यात आश्चर्य नाही. काँग्रेस आणि खिलाफतच्या स्थानिक सदस्यांनी मोपलांना शांत करण्यासाठी अशांत भागात प्रवेश करण्याची परवानगी मागितली आणि मिळविली, परंतु ते काही परिणाम करू शकत नाहीत हे मान्य करून ते परतले. जेव्हा सत्य यापुढे दाबले जाऊ शकले नाही आणि आपल्या सर्व नग्न लज्जास्पदतेसह बाहेर आले, तेव्हा गांधींनी विविध स्पष्टीकरणे, नकार आणि अधिकाऱ्यांची निंदा करून हिंदू मत जुळवण्याचा प्रयत्न केला, जे अहमदाबाद येथे काँग्रेसने पारित केलेल्या पुढील ठरावात शब्दरूप होते.

"काँग्रेस आपला ठाम विश्वास व्यक्त करते की मोपला त्रास असहकार किंवा खिलाफत चळवळीमुळे झाला नाही, विशेषत: उद्रेक होण्याच्या आधी सहा महिने जिल्हा प्रशासनाने  असहकार आणि खिलाफत प्रचारकांना जिल्हा अधिकाऱ्यांनी प्रभावित भागात प्रवेश नाकारल्यामुळे. गडबड होण्याच्या सहा महिने आधी पण दोन चळवळींशी पूर्णपणे संबंध नसलेल्या कारणांमुळे आणि अहिंसेचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचू दिला असता तर उद्रेक झाला नसता. तरीसुद्धा, ही काँग्रेस काही मोपलांनी केलेल्या कृत्यांचा निषेध करते. बळजबरीने धर्मांतर करण्याचा आणि जीवन आणि मालमत्तेचा नाश करण्याचा मार्ग, आणि मद्रास सरकारने मौलाना याकुब हसन आणि इतर गैर-सहकारी यांची मदत स्वीकारून मलबारमधील अशांतता लांबणीवर टाकली असती असे मत आहे. महात्मा गांधींनी मलबारला जावे, आणि पुढे असे मत आहे की श्वासोच्छवासाच्या घटनेने मोपला कैद्यांना दिलेली वागणूक ही अमानुष कृती होती. आधुनिक काळात न ऐकलेले आणि स्वत:ला सुसंस्कृत म्हणवणाऱ्या सरकारच्या लायकीचे नाही."


“काँग्रेसला स्पष्टपणे असं वाटतं की मोपला बंड हे असहकार आंदोलन किंवा खिलाफत कमिटीमुळे झालं नाही. प्रत्यक्ष बंड होण्याच्या आधी सहा महिने जिल्हा प्रशासनाने असहकार चळवळीचे प्रचारक किंवा खिलाफत कमिटीच्या प्रचारकांना त्या भागांत जाण्याची पूर्ण मनाई केली होती. जर त्यांनी परवानगी दिली असती तर अहिंसेचा संदेश त्यांच्यापर्यंत पोचला असता तर उद्रेक झाला नसता. तरीसुद्धा ही काँग्रेस मोपला बंडखोरांनी केलेल्या कृत्यांचा, सक्तीच्या धर्मांतराचा आणि जीवन आणि संपत्तीचा नाश या कृत्यांचा यांचा निषेध करते. तरी सुद्धा आम्हाला असे वाटते की मद्रास सरकारने मौलाना याकूब हसन याना किंवा असहकार चळवळीच्या काही सहकाऱ्यांना मलबारला जाण्याची परवानगी दिली असती तर मलबार येथे झालेली कृत्य टाळता आली असती. महात्मा गांधींना मलबार जाण्याची परवानगी मिळाली असती तरी हा उद्रेक टाळता आला असता. सरकारच्या निष्काळजीपणामुळे गुदमरून मृत्युमुखी पडलेल्या कैद्यांची गोष्ट कानावर आली, स्वतःला सुसंस्कृत म्हणावणाऱ्या सरकारला या कृत्यांची लाज वाटली पाहिजे.”

हा ठराव कोणत्याही अर्थाने विशिष्ट समुदायाचे नव्हे तर भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या काँग्रेस सारख्या महान राजकीय संघटनेने केलेला केविलवाणा प्रयत्न होता.  हजारो असहाय हिंदूंवर धर्मांध मुस्लिमांच्या टोळीने केलेल्या गुन्ह्यांचे प्रमाण कमी करून दाखवण्याचा हा  जाणीवपूर्वक प्रयत्न होता. हा प्रयत्न आणि साधारणपणे भारतीयांवर सरकारकडून, प्रशासनाकडून होणाऱ्या अन्यायाचं सरकार जे सामान्यीकरण करण्याचा प्रयत्न करते हे दोन्ही सारखंच. कोणत्याही निःपक्षपाती टीकाकाराने या दोन्ही गोष्टींचा तीव्र निषेध केला पाहिजे. कराची परिषदेच्या ठरावांना मान्यता देणार्‍या खिलाफतच्या बैठका आयोजित करणे, खिलाफतची घोषणा, खिलाफत राज्ये आणि खिलाफतचे ध्वज फडकवणे यासारख्या घटना स्पष्टपणे समोर असताना, मोपला बंड असहकार किंवा खिलाफत चळवळीमुळे झाली नाही, असे मानणे हास्यास्पद आहे..(१) आणि काँग्रेसच्या निवेदनामधले शब्द काळजीपूर्वक वाचले पाहिजेत. 

श्रीमती बेझंट यांनी मोपला बंडाचा असहकार आणि खिलाफत चळवळींशी निश्चितपणे संबंध जोडला आहे आणि इतर अनेक मान्यवरांनीही असेच मत व्यक्त केले आहे. मुस्लिम नेत्यांनी मात्र प्रत्यक्षपणे या मताचे समर्थन केले. अशाप्रकारे ३० डिसेंबर रोजी अहमदाबाद येथे झालेल्या मुस्लिम लीगच्या अधिवेशनात हजरत मोहनी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मोपलांच्या अत्याचाराविषयी पुढील निरीक्षणे नोंदवली. 

"मोपला त्यांच्या कृतीचे समर्थन करतात कारण अशा गंभीर वळणावर जेव्हा ते इंग्रजांविरुद्ध युद्धात गुंतलेले असतात तेव्हा त्यांचे शेजारी (हिंदू) त्यांना (इंग्रजांना) केवळ मदत करत नाहीत किंवा तटस्थता पाळत नाहीत तर इंग्रजांना सर्व प्रकारे मदत करतात. निःसंशयपणे, ते असे म्हणू शकतात की, ते त्यांच्या धर्माच्या फायद्यासाठी बचावात्मक युद्ध लढत असताना आणि त्यांची घरे, मालमत्ता आणि सर्वस्व सोडून डोंगर आणि जंगलात आश्रय घेत असताना, त्यांच्या कमांडरिंगला लुटणे असे वर्णन करणे अयोग्य आहे. इंग्रज किंवा त्यांच्या समर्थकांकडून त्यांच्या सैन्यासाठी पैसे, तरतुदी आणि इतर आवश्यक गोष्टी."

मोपला कारवाईला इंग्रजांविरुद्धचे धार्मिक युद्ध असे वर्णन करताना, हजरत मोहनी निश्चितपणे याला एक राजकीय चळवळ मानतात ज्याला खिलाफत आंदोलनापासून वेगळे करता येणार नाही. मोपलांच्या अत्याचाराचे त्यांनी दिलेले समर्थन केवळ टोकाचेच नाही तर वस्तुस्थितीच्या अगदी विरुद्ध आहे. बहुतेक प्रकरणांमध्ये सैन्य या भागांत भागात येण्यापूर्वी 21, 22 आणि 23 ऑगस्ट रोजी एर्नाड, वल्लुवनाड आणि पोनानी तालुक्यांतील हिंदू घरांची जवळजवळ घाऊक लूटमार करण्यात आली होती, या वस्तुस्थितीकडे ते दुर्लक्ष करतात. 


मोपला बंडखोरांबद्दलच्या आपल्या या भूमिकांमुळे काँग्रेसने ब्रिटिशांवर टीका करण्याचा नैतिक अधिकार गमावला. पंजाब मध्ये ब्रिटिश अत्याचार करतात अशी ओरड आता काँग्रेसचे लोकं करू शकणार नाही. आणि अनन्वित अत्याचार करणाऱ्या मोपलांना ‘ईश्वराला घाबरणारे’ असं म्हणून कौतूक करणारे गांधीजींची शब्द आणि जनरल डायरच्या कृत्यांना ओडवायरची ट्रेलिग्राफद्वारा मिळालेली मान्यता सारखीच मानली पाहिजे. 

जेव्हा मोपलांनी केलेल्या रानटी आक्रोशाच्या सर्व दु:खद कहाण्या देशभर गाजल्या होत्या त्यासारम्यान 1923 मध्ये कोकानाडा येथे झालेल्या खिलाफत परिषदेच्या वार्षिक अधिवेशनाचे अध्यक्ष होते महान राष्ट्रीय नेते, शौकत अली. अध्यक्षपदावरून त्यांनी अनाथ मोपला अनाथ आणि त्यांच्या कुटुंबाच्या पालनपोषणासाठी तरतूदी करावी असा ठराव मांडला. "हजारो मोपला शहीद झाले हे खरं आहे परंतु त्यांनी धार्मिक कार्यासाठी हा लढा केला म्हणून त्यांनी मनोभावे त्यांना श्रद्धांजली वाहिली होती." मोपलांच्या हातून काही हिंदूंना त्रास सहन करावा लागला हे मान्य करताना ते म्हणाले की, संपूर्ण प्रकरण त्यांच्यासाठी बंद पुस्तक आहे. पण त्यांना शूर मोपलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी जाहीर केले की ते आणि त्यांचा भाऊ मुहम्मद अली प्रत्येकी एका मोपला अनाथाच्या पालनपोषणाची जबाबदारी घेतील.


सरकारच्या हातून मोपलांना सोसाव्या लागणाऱ्या त्रासाचे कथन करण्यासाठी सदस्यानंतर सदस्य उठले, परंतु त्यांनी केलेल्या अमानुष रानटीपणाचा कोणताही संदर्भ नव्हता. खिलाफत परिषदेने शौकात अली यांनी मांडलेला ठराव स्वीकारला आणि मोपला अनाथांच्या देखभालीसाठी निधी गोळा करण्यात आला. पण मोपलांच्या अत्याचाराला बळी पडलेल्या हिंदूंच्या मदतीसाठी काँग्रेस किंवा हिंदू नेत्यांनी प्रयत्न केलेले दिसत नाहीत. 


Thursday 14 April 2022

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन । १९७५ कऱ्हाड । संमेलनाध्यक्ष दुर्गा भागवत । अध्यक्षीय भाषण

आज आपणापुढं उभं राहताना माझं मन फार संकोचून गेलं आहे. ज्यांच्या लेखनातून मला खूप स्फूर्ती मिळाली, त्या
इतिहासाचार्य राजवाड्यांचं स्मरण मला उत्कटपणे होत आहे. इतिहास-संशोधन तर राहू द्याच, पण भाषा, व्याकरण आणि साहित्य यांची सखोल जाण असणारा लेखक राजवाड्यांच्या काळी कुणिही नव्हता. अजूनही त्या कसाला उतरेल असा कुणी मला तरी दिसत नाही. त्या राजवाड्यांना या संमेलनाचं अध्यक्षपद मिळालं नाही ही महाराष्ट्र सारस्वताच्या इतिहासातली एक बोलकी घटना आहे. महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या इतिहासातील ती फार मोठी हानी आहे असंच नव्हे; तर हा महाराष्ट्राच्या साहित्याभिरुचीला लागलेला कायमचा कलंकच आहे असं मला तर वाटतंच, पण कुणिही अभ्यासू साहित्यप्रेमिकाला तसंच वाटेल अशी माझी खात्री आहे. राजवाड्यांची ही कथा, तर बिचार्‍या चिं. वि. जोश्यांची स्थिती तर काय वर्णावी?


मंडळी, मी बोलते आहे ते दोषदिग्दर्शन म्हणून नव्हे, तर खरोखर पोटात ढवळतं म्हणून सांगते आहे. राजवाड्यांचं महाराष्ट्रावर अपार ऋण आहे. त्यांची चोखंदळ दृष्टी नि निःस्पृह वृत्ती मला नेहमीच प्रेरक ठरली आहे. त्याचप्रमाणे चिं. वि. जोशी यांचा प्रसंगनिष्ठ निरोगी विनोद कुणाला आवडत नाही? चिमणरावानं कुणाला जिंकलं नाही? पण मला पाली भाषेचे, बौद्ध वाङ्मयाचे अभ्यासक म्हणून ते आठवतात. त्यांचं जातककथांचं लहानसंच आहे, पण त्यात निखळ भाषांतराचा उत्कृष्ट नमुना आढळतो. मला तो फार उपयोगी पडला. असे हे दोन थोर साहित्यसेवक ज्या पदावर चढले नाहीत, त्या पायरीवर पाऊल ठेवताना मला संकोच वाटतो आहे.

परंतु गतगोष्टीबद्द्ल पश्चात्ताप करण्यापेक्षा आपल्या हाती काही नाही, हे ही तितकंच खरं आहे. म्हणून या दोघांचं आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्या सर्वांसमक्ष मी अत्यंत आदरानं आणि कृतज्ञतेनं स्मरण करते. राजवाड्यांचं स्मरण करताना ‘चारित्र्ये तुझिया तुझ्यासम जगा लाभोत संशोधक’ असे एक मुकुंदराय कवी यांनी त्यांना उद्देशून जे उद्गार काढले आहेत, ते म्हटल्याशिवाय माझ्याच्यानं राहवत नाही. राजवाड्यांचं स्मरण एवढ्यासाठी मी प्रामुख्यानं करते की, राजवाडेच काय ते ग्रंथांचं कार्य निःसंदिग्धपणे सांगून गेले. एकाच वाक्यात त्यांनी सांगितलं की ‘ग्रंथसमूह हे समाजसुख आहे.’ सूत्रासारखंच हे वाक्य आहे. सूत्राइतकंच विश्वव्यापकही आहे. ठाण्याच्या ग्रंथसंग्रहालयात त्यांनी भाषण केलं, त्यातलं हे सूत्र. राजवाडे विचार करीत तेव्हा एखादा लहान मानवगण त्यांच्या डोळ्यांपुढे नसे. सबंध समाज ते कालाच्या विशिष्ट पार्श्वभूमीवर पाहू शकत असत. ‘ग्रंथ हे समाजसुख आहेत’ असं ते म्हणतात, तेव्हा त्यांना समाजाचं निरोगीपण, तृप्त भाव, विचारक्षमता आणि रसरशीतपणा अभिप्रेत असतो. ग्रंथ हे आपले गुरू आहेत, हे अनेकांनी सांगितलं. ग्रंथ हे मित्र आहेत, हे वाक्यही आता शिळं झालं आहे. पण ‘ग्रंथ हे समाजसुखं आहेत’ ही उक्ती कालबाह्य ठरणार नाही. कारण राजवाडेच त्याचं स्पष्टीकरण असं करतात की “ग्रंथ वाचल्याने मनुष्य विचार करू लागतो. विचारांचा खल झाल्यावर आचार बनतात व नंतर समाजाचे पाऊल पुढे पडते.”

राजवाड्यांना त्यांच्याकाळी जे विद्वान केवळ इंग्रजीत लिहीत, त्यांचा राग येई. ते म्हणतात की डॉक्टर भांडारकर, न्यायमूर्ती तेलंग हे पाश्चात्यांच्या तोडीचे, पण त्यांनी मराठीत लिहिलं नाही. (भांडारकरांची धर्मपर व्याख्यानं तेवढी मराठीत झाली, पण त्यांचा उल्लेख राजवाड्यांनी केला नाही.) राजवाड्यांचं म्हणणं असं की “त्यांनी जर मराठीत लिहिले असते तर भाषांतररूपाने ते परकीयांना कळते. जरा वेळ मात्र लागतो.” ते पुढे म्हणतात की, “आमचे राष्ट्र आहे. आमचा समाज आहे. आम्हास काही काम करायचे आहे, हा अभिमान धरून कल्पक पुरुष निघाला तर त्यास हा सगळ्या गोष्टी समजतील. त्यास त्रास पडेल; खायला मिळायचे नाही; आगगाडीत धक्के खावे लागतील, तरी पण ज्ञानमार्गात तो मोठा पुरुष होईल व त्यामुळे राष्ट्राचे हित होईल. परकी भाषेत केलेले कार्य चिरकालाचे नाही. केशवचंद्र सेन, राममोहन रॉय ही मंडळी आमच्या देशात व्हावी पण स्वभाषेत होऊ नयेत हे दुर्दैव नव्हे काय? मान-अपमान, लहानसहान गरजा ह्यांची पर्वा न करिता ज्या समाजात आपण उपजलो आहो त्याची भाषा आहे हे लक्षात धरून तिच्याद्वारे आपण असे दाखविले पाहिजे की आम्हांस विचार करण्याची ताकद आहे. जो कोणी असा तयार होईल त्यास ग्रंथसंग्रहालयासारख्या संस्था पाहिजे आहेत; नुसत्या पैशाने कार्य होतेच असे नाही. इंग्लंडातही कादंबर्‍याशिवाय इतर ग्रंथ लिहिणार्‍यास अन्नाची मोताद आहे. अशांचे अन्न ब्रिटिश म्युझियम असून तिच्या जोरावरच ते काम करतात.”

ज्ञानवंताच्या खर्‍या भुकेचं हे जे राजवाड्यांनी वर्णन केलं, ते मराठी साहित्यात अजोड असंच आहे. यावेळी मला स्वतःला एक उदाहरण आठवतं आहे ते सांगते. डॉक्टर केतकर वारल्यावर शीलावतीबाईंची काय अवस्था होती हे सांगायला नकोच. मुंबई विद्यापिठाच्या ग्रंथालयात मी त्यावेळी बसत असे. शीलावतीबाई आपल्या छोट्या मुलीला घेऊन त्या खोलीतच भाषांतराचं काम करायच्या. त्या मला म्हणाल्या, “भुकेनं नि विवंचनेनं डोकं फिरून जाऊ नये म्हणून मी ग्रंथालयात वाचायची नि कामं करायची सवय लावून घेतली आहे.”

उपाशीपोटी अधाशासारखं वाचन करणार्‍या साने गुरुजींचंही उदाहरण आपल्या सर्वांना माहित नाही असं नाही. विद्येची उपासना करणार्‍यानं कंगाल असावं असं कुणी म्हणणार नाही. पण विचार हे फार प्रखर असतात. सत्याची बूज राखणं हे विचारवंताचं ब्रीद असतं. सत्य सांगताना अनेकांच्या रोषाला बळी पडण्याचे प्रसंग अशांना येतात. वृद्धापकाळी बर्ट्रांड रसेल यांनाही तुरुंगवास भोगावा लागला हे सर्वश्रुतच आहे. तेव्हा उद्याचं समाजहित लक्षात घेऊन आज झगडणं विचारवंताला आपोआपच प्राप्त होतं. तीच त्याची कसोटी असते. तेव्हा आर्थिक स्वास्थ्याला विचारचंत कधी मुकेल याचा नेम नसतो.

राजवाड्यांनी आपल्या काळातल्या ज्ञानाच्या क्षेत्रातल्या परिस्थितीचा सूक्ष्म विचार केला होता. पारतंत्र्याच्या त्या काळी त्यांनी विचारवंताला कर्तव्याची जाणीव दिली. स्वत्वाची ओळख करून दिली. किंबुहना स्वत्व नसलं तर तेजच नाही ही जाण त्यांनी समाजाला नव्यानंं करून द्यायचा प्रयत्न केला. होय, तोही प्रयत्नच. कारण जे हे त्यांचे बोल कुठल्याही काळी विचारवंतांच्या उपयोगी पडावेत, त्यांचंच नेकमं विस्मरण आम्हाला घडलेलं आहे. तेव्हा त्यांचे ते अतुल समर्थ बोल आपल्यापुढे सदर करते:

हा कोंबट प्रकार महाराष्ट्रातील दमल्याभागल्या उच्च लोकांचा व उदार मनाच्या सरकाराचा झाला. परंतु सरकाराच्या मानभावी कळकळीवर भिस्त न ठेविता व महाराष्ट्रातील उच्च मंडळींच्या पूर्ववयातील अनास्थेकडे दुर्लक्ष न करिता, आपल्याला आपले कर्तव्य यथाशक्ती बजावले पाहिजे. त्याची हलगर्जींपणाने आपण हेळसांद केली तर पुढील पिढीचे अभिश्राप आपल्याला घ्यावे लागतील आणि आपल्या कर्तव्यशून्यतेबद्द्ल व मनाच्या दुबळेपणाबद्द्ल इहलोकी आपला विशेष बोज न राहता परलोकी आपल्याला झाडा द्यावा लागेल. दुनिया आबादीआबाद असतानाही मनुष्याला आपल्या कर्तव्याला जपावे लागते. मग सर्व बाजूने कालचक्र फिरले असता, राष्ट्रातले एकोनएक लोक देशोधडीला लागले असता, उलट्या काळजाच्या शत्रूने सर्वतोपरी नागवले असता, मतलबी लोकांच्या गोड बोलण्याला उच्च मंडळी भुलून गेली असता, परकीय मंडळींनी सुचविलेल्या अश्रुतपूर्व विषयांची निष्फल वाटाघाट करण्यात सर्व लोक गुंग होऊन गेले असता निष्काम बुद्धीने व एकतानतेचे कर्तव्य बजाविण्याची आवश्यकता विशेषच असते हे निर्विवाद आहे. अशा वेळी लहानसहान संकटांना भिऊन जाऊन किंवा जुजबी व अल्पकालीन फायद्याकडे नजर देऊन, जो मनुष्य कर्तव्याला विसरेल त्याने आत्मघात केला एवढेच नव्हे तर देशघात केला असेही होईल.

ह्यावर कोणी असा प्रश्न विचारील की, हे असे खडतर कर्तव्य तरी कोणते? तर ते स्वत्वरक्षण होय, असे आम्ही उत्तर करतो. हे स्वत्व म्हणजे काय? तर ते फार मिश्रणस्वरूपी आहे. त्यात देशाचा, भाषेचा, धर्माच, आचाराचा, विचाराचा, विकाराचा, गोत्राचा, हवेचा, पूर्ववृत्तचा, सुधारणेचा व खोडींचा अंतर्भाव होतो. ह्या सर्व गोष्ती हजारो वर्षांच्या अनुभवांचे फल होत. ‘भाषांतर’ मासिकाच्या दुसर्‍या वर्षांच्या आरंभीच्या अंकात राजवाड्यांनी हे उद्गार काढले आहेत. त्यात त्यांनी भाषेचा प्रामुख्याने विचार केला आहे. ते म्हणतात: भाषा ही समाजाचे बंधन आहे. भाषा ही विचाराचे वाहन आहे. भाषा ही धर्मांचे पुरस्करण आहे. भाषेशिवाय मनुष्यप्राणी संभवत नाही. भाषा व मनुष्य ह्या दोन वस्तूंचे सामान्याधिकरण आहे. ह्या ईश्वरी देणगीच्या द्वारे एकमेकांची सुखदुःखे आपण एकमेकांस कळवितो. ही मायादेवी उच्चनिच जे जे स्वरूप धारण करील त्या त्या प्रमाणे उच्चनीच विकारांची मोहिनी मनुष्यमात्रावर पडते. सर्व मानवी शक्तता हिच्या कृपाकताक्षावर अवलंबून आहे. उदार विचारांचे अंकुर या अमृतवल्लीलाच तेवढे फुटतात. हित्या अभावी सर्वत्र स्तबधता व शून्यता राज्य करते. ह्या देवतेची मनोभावेकरून आराधना केली असता सर्व काही प्राप्त होते व वर सांगितलेले बहुरूपी जे स्वत्व त्याचेही रक्षण होते. मंडळी, राजवाड्यांचा संदेश आपल्यापर्यंत पोचवण्यात मला जो आनंद वाटतो आहे, तो कसा सांगावा? राजावाडे ज्याला स्वत्व म्हणतात, त्याला आज अस्मिता म्हणतात.

ऐंशी वर्षांपूर्वी राजवाड्यांनी मांडलेले विचार आजही ताजे वाटत्तात, याचं कारण समाजप्रवाहांची ओळख त्यांना स्वतःच्या अनुभवांनीच झाली होती. या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यानंतरची परिस्थिती पडताळून पाहताना आपल्याला असं आढळून येतं की पारतंत्र्याच्या त्या काळात लेखकाला जेवढी प्रतिष्ठा होती, तेवढी नंतर राहिलेली नाही. सुरक्षिततेचा आभास निर्माण झाला. पैसा जास्त मिळतो. सरकारदरबारी मानाची स्थानं, पारितोषिकं मिळतात, किताबही मिळतात. पण वैचारिक क्षेत्रात, जनमानसात लेखकांना अधिकारित्व राहिलेले नाही. कारण या परिस्थितीत स्वत्वाची कसोटी लेखकाला स्वतःलाच आवश्यक वाटत नाही. स्वातंत्र्यानंतर कल्पकतेला व साहित्यगुणांना वास्तविक फार मोठा उठाव मिळायला हवा. जनतासंपर्काची साधनं आता अधिक प्रमाणात उपलब्ध झाली. परंतु यातून जनतेच्या अभिरूचीचा विविध अंगांनी विकास करून नवनवी कला व ज्ञानक्षेत्रं यांचा वाढ्ता परिचय लोकांना घडवण्यासाठी, स्वतःची प्रतिभा आणि ज्ञानमान वाढविण्यासाठी झटण्याचा प्रयत्न करण्याऐवजी अनेक थोर लेखकांनी व विचारवंतांनी रेडिओ, टीव्ही व इतर जनता-माध्यमांचा वापर करताना त्यासाठी काही मूल्यं, कसोट्या नि मानदंड यांचा त्याग करणं अपरिहार्य आहे अशी समजूत करून घेऊन, स्वतःची मूळ पातळी मात्र गमावलेली आढळते. ज्या यंत्रणेत सुधारणा घडविण्यासाठी प्रारंभी हे सज्ज झाले होते, तिचेच दास झाले. अमेरिकेतदेखील हे दृश्य दिसतं असं मेल्विन टूमिनसारखे विचारवंत सांगतात. मग आमची स्थिती तर काय वर्णावी?

सांगण्याचा हेतू काय की, माणसाची स्वत्वाची स्वतःच ठरवलेली कसोटी असल्याशिवाय सर्वसामान्य लोकांच्या नाममात्र कसोट्यांवर भिस्त ठेवून लौकिक यश कितीही पदरात पडलं, तरी त्यामुळे त्या तथाकथित विचारवंतांला भविष्यकाळाचं निदान करणं जमत नाही. भविष्यकाळात बघण्याची दृष्टी असल्याशिवाय कुठलीही मानवी समस्या खर्‍या रीतीनं आकलन करणंही शक्य नसतं. उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी, आपला व समाजाचा अभिमान व अस्मिता टिकवण्यासाठी संघर्षमय इतिहासाच्या अनुषंगानंच बुद्धीजीवी माणसं वर्तमान परिस्थितीचं वास्तवदर्शन घेऊ शकतात, आणि आपला रास्त अभिमान कायम राखू शकतात. ‘स्वतःच्या लायकीची जाणिवतेची आपली खरी सुरक्षितता असते’ हे टूमिनचं वाक्यदेखील या संदर्भात विसरता येत नाही. लेखकाचं समाजाच्या जडणी-घडणीत काय स्थान आहे हे त्याच्या अस्मितेवर आणि त्याचं समाजमनाशी ते ताद्रुप्य घडतं, त्यावरच अवलंबून असतं. पंचवीसतीस वर्षांपूर्वी लेखक हा एकप्रकारे वैचारिक अधिष्ठाता समजला जात असे. नेत्याचं भाग्य त्याला लाभत असे. खांडेकर, फडके वगैरेंंच्या सभांना राजकीय सभांसारखीच गर्दी व शान असे. पण आता हे मानबिंदू ढळल्याचं दिसतं. लेखकाच्या पुस्तकापेक्षाही रेडिओ, टीव्ही व वर्तमानपत्रं यांतून होणारं  त्याचं दर्शन अधिक महत्वाचं गणलं जाऊ लागलं आहे. ही सार्वजनिक माध्यमं त्यांचं-त्यांचं तंत्र लेखकाला आत्मसात करायला लावीत आहेत. तत्काळ धनप्राप्ती, प्रसिद्धी आणि प्रसार यांना लेखकही सहज वश होतो आणि निखळ लेखनाचं जुनं तंत्र बाजूला ठेवून तो इतर प्रसंगही या तंत्रांच्या चौकटीतच फार खोलवर न जाता, त्यांच्या विषयाच्या व आशयाच्या मर्यादा जणू त्याच दूरवर परिणाम करणार्‍या आहेत असा समज करून घेऊन चुरचुरीत भाषा, थोडी करूणा, थोडा विनोद, माहितीची अपुरे तुकडे वगैरेंचा एक रंगीन आकृतीबंध निर्माण करून लोकांचं रंजन करतो. त्याच्या अविष्काराचं सूत्रच बदलतं. त्याची भूमिका विचारवंतापेक्षा, कलावंतापेक्षा रंजकाची होऊन बसते. लोकही मग रंजनालाच प्राधान्य देतात. साहित्यिकाच्या ज्या सभांना गर्दी होते, ती त्याच्या गमतीच्या मालमसाल्यासाठी होते. कथाकथनाच्या गर्दीवरूनही साहित्याचे निकष कळावेत. यावरून मी कथेला तुच्छ मानते असं कुणी समजू नये. कथाकथनात रंजक, ठरीव कथांनाच अग्रक्रम मिळतो म्हणून गर्दी होते.

अशा परिस्थितीत साहित्य ही श्रेष्ठ कला राहात नाही. ती दुय्यम दर्जाची कला होते, नव्हे झालीच आहे असं पॉल गुडमन म्हणतात ते काही खोटं नाही. साहित्याला दुय्यम कलेचं स्थान येऊ न देण्याचं एक रहस्य आहे, ते म्हणजे लेखकाचं लोकांची बोलीभाषा आत्मसात करण्याचं कसब. अभिव्यक्तीची नवी घडण. बोलभाषा सदैव आस्तित्वात असते, आणि बोलीभाषेतले प्रयोग वाङ्मयाला ताजेपणा आणतात आणि संवादसूत्र साधतात. मराठीत व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील, आनंद यादव वगैरे अनेक लेखकांना जे यश मिळालं, ते याच बोलभाषेच्या आत्मसातीकरणामुळे.

या परिस्थितीत स्वतःच्या इमानाला जापणार्‍या विचारवंताची स्वतःला या लोकप्रिय माध्यमाच्या करवी सत्तास्पर्धेकडे खेचू न दिल्यामुळे काय स्थिती होते, ती ‘लोकांचा पाठिंबा नसलेल्या मूठभर विद्वानांना विचारतो कोण?’ अशा बिरूदानंही होते. पण हे खरं नाही. या मूठभरांचाच वचक सत्ताधार्‍यांना वाटतो. सेन्सॉरशिपची नियंत्रण कडक बनतात ती ज्यांना लोकप्रियता नाही त्यांनाच वचक बसावा म्हणूनच ना?

उदाहरण मार्क्सचंच घेऊ. तो जिवंत होता, आपले विचार सांगत होता, त्या वेळी मूठभर विचारी लोक सोडल्यास बाकी कुणी त्याचं कौतुक करीत नव्हतं. तरीही मार्क्सच्या विचारांची धास्ती वाटली म्हणून जर्मन शासनानं त्याला हद्दपार केलं. परंतु लोकशाही असलेल्या इंग्लंडात त्यानं आपल्या सिद्धांतावर भरपूर लिखाण करून त्याचा प्रचार केला, तरी ब्रिटिश शासनाला त्यापासून आपल्याला धोका आहे असं वाटलं नाही. त्याला लोकप्रियता लाभली नव्हती. त्याच्या प्रेतयात्रेला अवघे बाराच लोक होते. परंतु तो मेल्यावर जेव्हा त्याचे विचार देशोदेशी रुजू होऊ लागले, तेव्हा इंग्लंडातही त्यच्या विचारांबद्द्ल धास्ती उत्पन्न झाली आणि मार्क्सवाद्यांवर शासनाची अवकृपा झाली. म्हणून ज्या ज्या विचारवंतांवर असं शासकीय नियंत्रण येतं, ते त्यांचा लोकांत आदर आहे म्हणूनच येतं हे उघड आहे. साहित्याचा पाया म्हणजे जाणीव. शंकराचार्यांनी शास्त्राच गुण ‘ज्ञापकता’ म्हणून सांगितला आहे. तीच ज्ञापकता म्हणजे जाणीव साहित्यालाही लागू आहे.

साहित्याचे दोन भाग असतात : अभ्यासू लेखन आणि ललित लेखन. अभ्यासू लेखनात चेतन मन जागता पहारा ठेवून असतं, तर ललित साहित्यात स्वप्नभूमी तळातून वर आल्यासारखी वाटते. कल्पना, विचार, स्मृती व भान या सार्‍यांचं रसायन होऊनच ललित लेखनाची निर्मिती होते. त्या निर्मितीचा केवळ भावनेशीच नव्हे तर देहाशी व आगच्यामागच्या जीवनाशीही घनिष्ठ संबंध असतो. कारण हेच अनुभवाचं अधिष्ठान असतं. अनुभव जेवढा बलिष्ठ, तेवढा त्याचा अविष्कार समर्थ होतो. तो अधेमधेच तुटला तर दुबळा होतो. लेखकाची खरी कमाई म्हणजे ललित लेखन तयार होत असताना येणारा उल्हास, व्यावहारिक पातळीवरचा ताण आणि मनाला शांत करणारी दमणूक. अशा अविष्काराचा संबंध कुठल्याही ऐहिक सिद्धीशी नसतो, हेच लेखकाचं परमभाग्य आहे. व्यवहाराशी अविष्काराची सांगड पडली की लेखन उणावतं आणि लेखकही घसरू लागतो.

कवितेप्रमाणेच ललित लेखनाला भाववृत्तीत डूब घेण्याची आवश्यकता असते. किंबहुना, भाववृत्ती नसेल तर सृजनाचा अंकुर उगवणारच नाही. प्रिती, मृत्यु, प्रत्यक्ष जीवन आणि सृष्टीचा विराट पसारा यांच्यातल्या अबोल रहस्यांची बोचणी लागल्यावाचून भाववृती जागी होत नाही. ही बोचणी सांभाळायची असेल तर अनेक व्यावहारिक व्यवधानं खड्यासारखी बाजूला टाकावी लागतात. एकदा भाववृत्तीनं मनाचा कबजा घेतला की मग तिच्यात सांगीप्रमाणं लेखकाला चालणं पडतं व पडावं. आधी जे  तंत्र आत्मसात करू म्हणतो, ते प्रत्यक्षात क्वचितच घडतं. पण अंतःचक्षूनं जे पाह्यलं, मनानं जे अनुभवलं, त्यांचं एकीकरण झालं की एक वेगळंच तंत्र त्यातून साकारतं. हा रूपबंध ज्याचा त्याचा वेगळा असतो.

साहित्याची मूळ प्रेरणा ज्ञापकता असते, यातच माणसाच्या आपल्या मनाशी होणार्‍या तादात्म्यातलं संवादसूत्र आलं. ‘काया-वाचा-मने’ या आपल्याला परिचित अशा शब्दप्रयोगातच या संवादसूत्राचं रहस्य दडलेलं आहे. माणूस प्रथम स्वतःशी सुसंगत झाला नाही, तर तो कुणाशीच सुसंगत होत नाही. त्याचा संवाद इतरांशी पण जुळत नाही. संवादाला प्रारंभ स्वतःपासूनच होतो. लेखन करतानाही लेखक अलिप्त दृष्टीनं स्वतःकडे व स्वतःच्या कृतीकडे पाहू शकला, तरच त्याच्या उक्तीला प्रत्ययकारिता येते. अशा लेखकातच वाचकही असा सुप्तपणे सतत वसत असतो. बाकीचे मूर्त वाचकदेखील या मूळ वाचकाचीच प्रतिरूपं असतात. हा मूर्त वाचकच साहित्याची सिद्धी-असिद्धी ठरवतो. ती लेखकानं ठरवायची नसते. वाचकही लेखकाप्रमाणंच साहित्यकृती घडवतो अशी माझी श्रद्धा आहे.

लेखक-वाचकातल्या संवादामुळेच वाल्मीकीचा शोक आपलाही शोक होतो. त्याचा श्लोकदेखील आपलाच असतो. ‘रामायण’ हे नाव आपल्या कृतीला दिलं तरी ‘न हि रामस्य चरितंम, सीतायाश्चरितं त्विदम्’ असं तो आपल्याला सांगतो. ते आपण मानतो. ‘सीतायना’ ऐवजी ‘रामायण’च नाव आपण पत्करतो. संवादाच्या आधारावर हवी तेवढी रामायणं रचली जातात नि ती सारीच तोलाची ठरतात. वाल्मीकीनं वाङ्मयाच्या फलश्रुतीचे आणखी एक प्रात्यक्षिक आपल्यापुढं उभं केलं आहे. भविष्यकालीन घटना त्यानं मांडली आहे. पुढे ती प्रत्यक्ष घटनाच झाली. भविष्यात पाहण्याची दृष्टी सृजनशील लेखकाला किती आवश्यक असते हे कुठलाही सिद्धांत न मांडता, साहित्यिक क्रियाप्रकियांचा घोळ न घालता आपल्याला फार प्राचीनकाळीच रामायणाच्या बाबतीत घडलेलं दिसतं. वाङ्मयात मिथ उर्फ पुराणकथा किंवा दंतकथा घडवण्याची शक्ती ज्या प्रमाणात जास्त व सतत चालू असते, त्या प्रमाणात ते वाङ्मय व पर्यायानं तो समाजही अधिक समर्थ आणि प्रवाही आणि जिवंत बनतो. या पुराकथांच्या निर्माणात माणसाची कल्पकता, प्रतिकप्रियता, त्याच्या आवडीनिवडी, त्याचे आदर्श आणि त्याची कलात्मक अभिरूचीही व्यक्त होत असते. या पुराकथाही एका ठशाच्या नसतात. त्यांचे रूपबंधही सारखे नसतात. काही कथात्मक असतात, तर काही प्रथात्मक असतात, तर काही संकल्पनात्मक असतात. उदाहणार्थ, रामाची कथा आहे, चातुर्वण्य ही प्रथा आहे आणि प्रारब्ध ही संकल्पना आहे. पुराकथेमुळे, मिथमुळे जीवनातला विस्कळीतपणा जातो, जीवनात सुसूत्रता येते. मिथमुळे समाजातल्या घटकांचं सहज सुसंघटन होतं. आचारविचारांना दिशा लागते. परंतु दैवतकथा किंवा मिथ ही माणसाला जखडून टाकते. ज्या समजुतीमुळं माणसाची पूर्वी मुक्तता झालेली असते, तीच त्याला अवजड होऊ लागते. उदाहरणार्थ, रामराज्य, चातुर्वर्ण्य या कल्पना आया बदलत्या जाणिवांमुळे कालबाह्य झालेल्या आहेत. माणसाचं जीवन तर पुढेपुढेच जातं. त्याचं मनदेखील नवे अनुभव घेत असतं. त्याच्या मानसिक नि आत्मिक गरजा उत्तरोत्तर अधिक मूर्त स्वरूप घेतात नव्या प्रेरणा जुन्या प्रतीकांना नि समजुतींना छेद देतात. नि मग आपोआपच हे नव्या प्रेरणांनी भरलेलं मन नवी प्रतीकं नि कल्पकथा बनवूं लागतं. त्या कथाही अशाच आग्रही असतात. कधी जुन्या कथांत नवा अर्थ भरला जतो. उदाहरणार्थ, फ्रॉइडनं इडिपसच्या कथेला दिलेला नवा संदर्भ. चातुर्वर्ण्याची जागा नव्या काल्पनिक संपूर्ण मानवी समतेच्या कल्पनेनं घेतलेली आहे. जुन्या पठडीप्रमाणे जगातल्या सर्व आदिवासी जमातींच्या मूळ नावांचा अर्थ ‘माणूस’ असा आहे. आणि आपली जात हीच मानवंशाची मूळ जात अशी दृढ कल्पना आहे. जेव्हा ख्रिस्ती, हिंदू वगैरे समाजात हे लोक शिरताअ, तेव्हा त्यांची मनोभूमी विस्कळीत होते. एकतर ते जातीव्यवस्थेचा इन्कार करून आपल्या जुन्या कल्पनांना सार्वत्रिक रूप देऊ पाहतात किंवा आपापल्या समाजाची पुराकथाकल्पनाची शक्तीही गमावून बसतात. विज्ञानानंही अनेक कल्पकथा पुरवलेल्या आहेत. उदाहरणार्थ, डार्विनचा माकडाचा माणूस होतो या सिद्धांतातला लुप्त झालेल दुवा. ग्रेटेस्ट गुड ऑफ द ग्रेटेस्ट नंबर ही एकोणिसाव्या शतकातल्या अर्थशास्त्रज्ञांची श्रद्धा. गोर्‍या माणसाचं ओझं ही कल्पना. सांगायचा मुद्दा असा की कल्पकथा किंवा मिथ दुहेरी काम करते. ती नव्या, येऊ घातलेल्या जीवनाची सूचना देते, त्याला आशय पुरवते. पण जुनी झालेली कल्पकथा जीवन ठोकळेबाज करते.

विचारवंत आणि साहित्यिक जुन्या कल्पकथा मोडतात नि नव्या घडवतात देखील. याच कल्पकथांतून म्हणी, गाणी, प्रथा यांचं गुंतागुंतीचं भव्य शिल्प सर्व भाषांच्या आणि बोलींच्या समाजात सदैव आढळून येतं. उदाहरणार्थ, हिंदू माणूस स्वतःकडे बघताना नकळत आपण राम व्हावं असं चिंतीत असतो. एकबाणी, एकवचनी नि एकपत्नी राम हाच आदर्श असतो. बायकांपुढे आपण सीतासावित्री व्हावं हाच आदर्श असतो. बौद्धांना बोधिसत्व आधार देतो.
माणूस स्वतःसाठी आणि दुसर्‍यासाठी अनेक भूमिका धारण करतो. माणसाचं अस्तित्व अनेकपदरी आहे. ते खुलं आहे, अनिर्बंध आहे. माणूस दुसर्‍याच्या भूमिकेत स्वतःला पाहू शकतो. जड वस्तू व प्राणी यांचं आस्तित्व त्यांच्यापुरतं आणि बंदिस्त असतं. तिथं देहाचंच आस्तित्व असतं माणसाला जबाबदारी घेता येते, तशी ती टाळताही येते. पण तिथंही त्याला निर्णय घ्यावा लागतो. निर्णयशक्तीचा वापर करण्यातच माणसाची खरी पारख असते. ज्या कल्पकतेनं पूर्वी जीवनाला अर्थ दिलेला असतो, तीच कल्पकथा माणसाचा कोंडमारादेखील करते. ती मोडल्याशिवाय कुठ्लंच नवनिर्माण होत नाही. पण कल्पकथा ही माणसाला संपूर्ण वेढून टाकणारी असते. ती दूर करता येत नाही. तरी ती मोडून अगर तिला नवा अर्थ विचारवंत अगर कलावंत प्राप्त करून देत असतो आणि सामुदायिक आणि वैयक्तिक जीवनाला नवी प्रतिष्ठा प्राप्त करून देत असतो. पण कल्पकथेचं निर्माण ठरवून येत नाही. जीवन स्वयंप्रेरणेनं, असतं तसं सहज जगल्यानंच ती घडते. अमुक एक गोष्ट तू लिही, असेच विचार मांड, असंच परिस्थितीचं चित्रण कर, असं लेखकाला सांगणं बरोबर नाही. पीनलकोडप्रमाणे साहित्याला नियमबद्ध करणं नुसतं हास्यास्पदच नाही, तर धोकादायकदेखील आहे. कवची प्राणी असतात. त्यांची वाढ जास्त झाली की कवच गळून पडतं. पण माणसाची मानसिक वा अनिर्बंध असल्यानं त्याला ही कवचं धोरण आखून काढून टाकावी लागतात. अनिर्बंध सुरक्षितता कल्पिण्याची शक्ती माणसात असते. तिच्यापायीच तो असुरक्षितपणाचं आव्हानही स्वीकारतो, धोक्याचं जीवन पत्करतो आणि भावी सुखाची चित्रं रेखाटतो. या कल्पनेतेतूनच रोमँटिसिझम येतो. खरा रोमँटिसिझम स्वागतार्ह असतो. नकली रोमँटिसिझम आपल्याकडच्या लिखाणात फार आढळ्तो. पण नकली रोमँटिसिझम किंवा तशीच कल्पनारंजित साहित्यकृती वगैरे जीवनातल्या समस्यांसाठी खोट्याच उतार्‍यांचं सूत्रचालन करतात. पण वास्तव ते वास्तव. स्वप्नरंजन आपणा सार्‍यांनाच अतिशय प्रिय असतं. पण ते प्रिय असलं तरी इष्ट नव्हे. त्यात फार मोठा धोका आहे. हा धोका स्वप्नरंजनाच्या पूर्ण आहारी जाण्याचा आहे. वास्तव शोधण्यात खरं आश्वासन असतं. कारण वास्तवाला मार्यादांचं बंधन असतं आणि त्या मर्यादांचं भान आपण राखतो. अतिस्वप्नरंजन शेवटी भयकारक ठरतं. कारण त्याला मर्यादाच माहीत नाहीत. ऐतिहासिक व चरित्रात्मक वाङ्मयात त्याचा पडताळा येतो. काही माणसं भूतकाळात रमतात, तर काही वर्तमानातच असतात. या दोघांनाही भविष्यात संचार करण्याची ताकद नसते. अशांचे विचार एकांगी बनतात. भूत, वर्तमान नि भविष्य या तिन्हींतही संचार करण्याचं सामर्थ्य रोमँटिसिझममधून येतं. अद्याप हा प्रकार आपल्याकडे रूढ झाला नाही.

ललित साहित्याचा जो प्रभाव माणसाच्या मनावर होतो, त्याचं कारण त्यातल्या आशयाला असणारे अनेक स्तर, अनेक पदर, त्याची अनेकविध स्पंदनं. हे स्तर,पदर, स्पंदनं त्या त्या माणसाशी त्याच्या त्याच्या भाषेत त्याच्या त्याच्या भावनांत बोलतात. त्याला सुजाण करतात. त्याला आतून घडवतात. इथे आशय शब्दाची फोड करायला  हवी. आशय म्हणजे विषय नव्हे. माझ्या कवितेचा विषय झाड असेल, पण आशय कदाचित् माणसाचं नित्यनिरंतर एकटेपण असेल. कदाचित् कधीही आणि कशालाही हार न जाणारी त्याची जिद्द, त्याची जबर हिंमत असेल. हा आशय मोकळा असावा लागतो. पण त्यासाठी तो सांगणारा कवी, कादंबरीकार, कलावंत मोकळा ठेवावा लागतो. हा आशय केवळ संदेश झाला किंवा ठाम आणि निश्चित आदेश झाला तर कवी संपतोच, पण ज्याच्या कवितांतून भावी पिढ्या घडणार असतात, त्या पिढ्याही संपतात. प्रत्येक कलाकृती म्हणजे आशय आणि आकार यांचा लग्नबंध. मात्र यावरून या आधुनिक केवळ वीसपंचवीस वर्षांची, प्रामुख्यानं स्पेंगलरनं वर्णन केलेली आधुनिक संस्कृतीची भ्रामकता व स्खलनशीलता दाखवण्यासाठी व तिच्यातून बाहेर पडण्यासाठी विविध समस्यांचा विचार करून मानवाचं भवितव्य सुघटित होईल, या हेतूनं लिहिलं गेलेलं वाङ्मय हे रामायणाच्या पातळीवरचं आहे असं कोणी समजू नये. रामायणातील भवितव्याची जाण देशकालाला भेदून जाणारी, दैवतकथेची सर्वत्र प्रेरणी करणारी आहे. आधुनिक कादंबरीतूनदेखील काही ठिकाणी मिथचा आश्रय केला जातो. युलिसिसप्रमाणं. पण दैवतकथेची तर्कातीत व तरीही सुसंगत पातळी तिला लाभत नाही. पौराणिक वाङ्मयात रामायण ही या दृष्टीनं अजोड कृती आहे.

लेखक जेव्हा त्या त्या काळाचा मागोवा घेऊन अधिकारितेनं लिहितो, तेव्हा पुढल्यांना त्यातल्या कालिकतेतून सिद्ध झालेल्या प्रत्ययांचा पडताळा येतो. विसाव्या शतकांतल्या लेखकांत युरोपमध्ये बरीच हिंसकता, वैफल्य आलेलं दिसतं त्याचं कारण ह्या काळाच्या वाढत्या मानसशास्त्रीय, भौतिक व सामाजिक शास्त्रांच्या ज्ञानाबरोबर लेखकांच्या मनातले मागच्या परंपरेतून आलेले कृत्रिम बंधही फुटले. मनात नवे प्रवाह खेळू लागले. चिंतनाला व भावनांना नवी आव्हानं आली. त्या परिस्थितीचा स्वीकार करून त्यांनी लिहिलं. म्हणून आता आपल्याला अमुक एक लेखक जे लिहितो ते त्याच्या काळात जे प्रवाह होते त्यांच्या जाणिवेपोटीच लिहितो हे पटतं. आपल्याकडचं उदाहरण जयवंत दळवींच्या ‘संध्याछाया’चंच घेऊ. त्यातलं म्हातारं जोडपं पारंपरिक भावनांचं प्रतीक आहे. त्यांना घरगड्याजवळ बोलावंसं वाटतं. पण तो बोलत नाही. यंत्रासारखं काम करून चालता होतो. पुढे येऊ घातलेल्या भावनाहीन पण कार्यक्षम यांत्रिक संस्कृतीचंच प्रतीक तो आहे.

साहित्यनिर्मिती व परिस्थिती यांच्याबाबतीत अन्नदाशंकर राय यांचं एक विधान लक्षात घेण्याजोगं आहे. ते म्हणतात : अमुक एका विशिष्ट परिस्थितीत आपण हजर असायला हवं असं वाटलं की आपण लिहितो. आपण लेखक असल्यानं आपली हजेरी म्हणजेच लिखाण. अन्नदाशंकर आणखी असंही म्हणतात की, कठीण परिस्थितीत कलावंत किंवा साहित्यिक हा गर्भार बाईसारखा असतो. बाहेर काय वाटेल ते येवो, त्यानं आपला गर्भ जपावा. अर्थात लेखकाची निर्मिती किती खोलवरून येते, ती बाहेर पडायला काय कष्ट पडतात आणि ती बाहेर आल्यावर वाचक आपली भर टाकून तिला पुरता आकार कसा देतो - हीच साहित्यनिर्मितीची नैसर्गिक प्रक्रिया आहे. याशिवाय अन्य बाह्य संबंध व बंधनं ही केवळ साहित्यबाह्य आहेत असं नव्हे, तर ती संपूर्णपणे गैरलागूही आहेत.  

कथासाहित्याचा आविष्कार द्वंद्वात्मक असतो. त्यातले रूपबंध असे : ताण आला की मागून शैथिल्य येतं, वेदनेमागून तिचं निराकरण येतं, भीती आली की पण किंवा आव्हान आलंच, वैषयिक क्षोभ आला की वासनातृप्ती आलीच, दुःखामागून सांत्वन येतंच. या जोड्यातलं जे अतूट नातं असतं, त्यातूनच आकृतिबंध निर्माण होत असतात. मानवी भावनांत विकास आणि स्थगन, प्रवाहीाणा आणि साचीवपणा, संघर्ष, गति आणि बंदिस्तपणा, अकस्मात आलेली उत्तेजकता, स्वप्निल शैथिल्य, सुख नाही नि दुःखही नाही अशी बधीरता - पण त्यातही दोन्ही अवस्थांत कुठंतरी असणारी मात्र माणसाला जे जे भावतं आहे ते क्षणिक असलं तरी थोर आहे आणि हे सारंच्या सारं अनंत काळापर्यंत माणसापासून कायम निघूनच जाणार आहे, ही जाण आवश्यक असते. ‘संयोगा विप्रयोगान्ताः’ म्हणतात ते हेच.

अवतीभवती अनावश्यक गोष्टींचं अस्ताव्यस्त कोठार भरलेलं असतं. त्यातून आपल्याला हव्या त्या प्रसंगासाठी आवश्यक तेवढाच भाग घेऊन बाकीचा छाटून टाकणं हीच लेखकाची किमया असते. प्रसंग जितका कमी रेखांत पण परिणामकारक दाखवता येईल, तितकं लेखकाचं यश महनीय ठरतं. या विवेचनाची मुख्य गरज अशी की कलात्मक आविष्कार जाणिवेच्या अनेक पातळ्यांना स्पर्शून जात असतो. कलात्मकतेची संवादशीलता ती किती स्तरांवर पोचू शकते यावरच अवलंबून असते.

गेल्या जागतिक युद्धानंतर एका नव्याच जीवनसंघर्षाचा अनुभव बर्‍याच लेखकांना आला. हा संघर्ष मनोमय आहे. त्यात सुसंगत वाटणार्‍या जीवनातील विसंगतीच मानवी मन पाहू लागतं. एका जीवनसमस्येचं स्वरूप आकलन करू पाहतं. ती समस्या म्हणजे सध्याच्या जगात जगभर तरूणांना जाणवणारी प्रखर शून्यमनस्कता. पाश्चात्य राष्ट्रांत दोन महायुद्धांचा परिपाक म्हणजे विज्ञानाची बेसुमार वाढ आणि त्याबरोबर व्यक्तिमात्राला आपलं केंद्र हरवल्याची प्रखर जाणीव. मानची आस्तित्वाचं मूल्य हरवल्याची वेदना व निष्फळता. प्रेम, निर्मळ व्यवहार, आर्थिक प्रामाणिकपणा, कशावर तरी निष्ठा ही  जुनी मूल्यं माणसाला आशान्वित करीत राहतातच. त्यांनीत तो काहीकाळ तरारतो, थरारतो. पण वाट्याला येते ती केंद्र हरवलेल्या वीराट मानवसमूहांच्या भ्रांत क्रियाप्रक्रियांतून उद्भवलेली भकास जाग. हा माणूस कुठल्याही देशातला असो, संस्कृतीतला असो- त्याच्या आस्तित्वाचा परिघ केंद्र गमावलेल्या चाकोरीचा असतो. तिथ उत्कटता असते, हर्षाची नि उदासिनतेची गती असते ती आधुनिक जीवनाच्या स्पर्धामय वेगाची. तो वेग माणसाला धावायला लावतो. केंद्र असणारा माणूस त्या वेगाला आकार देतो, विकास हुडकतो. पण हे अल्पकाळ. त्या जीव घेणार्‍या वेगात केंद्रच हुकतं. माणूस धापा टाकतो. पूर्वीची नियतीची जागा आता या मानवग्रासी वेगानं घेतली आहे. या धावपळीत विजयी वीरदेखील केंद्र हरवल्यानं अपेशीच असतात. मानवी मन अस्वस्थ असतं. ते स्वतःला चकवतं, दुसर्‍याला चकवतं, नि मग वंचनेलाही विटतं. नाहीतर ते क्षणप्रेमी बनतं. क्षणाक्षणात भरलेल्या अलगालग सुह्खाच्या गोळ्या गिळून ते उत्तेजित होऊन जगतं.

धार्मिक, आर्थिक, सामाजिक आणि लैंगिक व्यवहार हे माणसाच्या मनाच्या शुद्धाशुद्धतेवर अवलंबून असतात. माणूस हाच सर्व व्यवहारांचा निर्माता, साक्षी आणि निर्णायकदेखील असतो. सर्व सुसंगत-विसंगत जीवनानुभवांना वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर एकत्र आणताना ही भूमिका एक आकार देत असते. जितका हा आकार स्वच्छंद, तितकी नीतीची जाण तरल आणि सर्वस्पर्शी बनत जाते. कारण इथं आता मूल्य जन्म घेत असतं. मूल्य हे विचारांच्या जगात फार महत्त्वाचं असतं. कारण त्याच्याशी तर व्यक्तीच्या व समूहाच्या अनुभवाचं सूत्र अनुस्यूत असतं. मूल्य हे भावनांची लय साधतं, विचारांचा तोल राखतं आणि माणसाच्या व्यक्तिगत कृतिउक्तींतूनदेखील त्याच्या समाजाच्या स्थितीगतीचं दिग्दर्शन करू शकतं.

या संमेलनाचे एक पूर्वीचे अध्यक्ष औंधचे राजे भवानराव पंतप्रतिनिधी होते. राजेरजवाडे अध्यक्ष कसले? हा सूर पुष्कळदा ऐकू येतो. आणि त्यात वावगं नाही. परंतु आताही त्यांच्या कर्तृत्वाची छाननी कधी निसटून जाते. याच राजेसाहेबांनी अखेरच्या काळात आपलं आत्मचरित्र लिहिलं होतं. त्यात त्यांनी राजघराण्यातली मुलं का बिघडतात त्याचं अतिशय उघडंनागडं दर्शन केलं होतं. पंचवीसतीस वर्षांपूर्वी तर असं लिहिणं म्हणजे परम अश्लील होतं. आणि त्याचा परिणाम म्हणजे त्यातले असंबद्ध उतारे वृत्तपत्रांत अत्यंत कुटाळकीच्या स्वरूपात इतस्ततः अवतरले. त्याचा परिणाम ते पुस्तक कायमचे जप्त होण्यात झाला.

मी ते पुस्तक वाचलेलं आहे. सत्य परिस्थितीचं वास्तव व विदारक दर्शन त्यात आहे. परंतु लोकांच्या भावना चाळवण्यासाठी जी चावट पुस्तकं लिहिली जातात, त्यात राजेसाहेबांच्या या कृतीची गणना करणं अन्यायाचं होईल. त्या लेखनात लेखनाची शिस्त आणि शैली नसली तरी पोटतिडीक आहे आणि चित्रकला, इतिहास वगैरे विषयांत गती असलेल्या , सामाजिक प्रगतीची जाणीव असलेल्या एका पुरुषानं स्वतःच्या अनुभवांचं व विचारांचं आलेखन करण्यासाठी ते लिहिलेलं आहे. लोकांच्या मनाला उबग आणतील, हादरा देतील व स्वतःची सामाजिक प्रतिष्ठाही उणावेल असं प्रामाणिक लेखन एखाद्या संस्थानिकानं करणं ही मूळातच एक प्रचंड घटना होती. लहान संस्थानिकांच्या जीवनात असणारे ताणतणावे इथं दिग्दर्शित होतात. कला, न्याय, शरीराचं आरोग्य या विषयांत प्राण ओतून काही घडावं यासाठी धडपडणार्‍या या राजानं स्वतःच्या आयुष्यातलं भलंबुरं न लपवताना आपलं जीवन झाडामाडासारखं जनतेपुढं ठेवलं. बालमानसशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ व राजकारणाचे अभ्यासक यांनाही हा वृत्तांत उपयुक्त असाच होता. पण आमचे अपसमज आडवे आले. मानीव सोवळेपणाला तो प्रामाणिक आलेख बळी पडला. अश्लीलतेचा भयंकर बभ्रा झाला. आणि या पुस्तकावर बंदी आली ती अजून उठली नाही.

या गोष्टीचा मी उल्लेख केला तो अशासाठी की, इतक्या त्रयस्थ वृत्तीनं आत्मचरित्र सहसा कुणी लिहीत नाही. समाजाला त्यामुळे बोध व्हावा ही तळमळदेखील क्वचितच आढळते. आपल्याकडची आत्मचरित्रं बहुशः एकांगी व आत्मविसंगत असतात. पुष्कळांची शैली चांगली असते. पण शैली म्हणजे सत्य नव्हे. राजकारणी पुरुषदेखील आत्मचरित्र लिहिताना प्रामाणिकपणा पाळीत नाहीत. त्यांच्यात दृष्टीचाही अभाव अनेकदा आढळतो. आपण कसे घडलो, आपल्याला आपल्या त्रुटीमुळे अगर बाह्य परिस्थितीमुळे काय भोगावं लागलं, ते ते सांगत नाहीत. त्यांच्यात न्यायीपणाच आढळत नाही. स्वतःची प्रतिमा घडवण्यासाठीच लोक झटत असतात. अपवाद फक्त गांधींचा. आता राजेरजवाडे उरलेले नाहीत. परिस्थितीत बदल झालेला आहे. लैंगिक गोष्टींकडे पुष्कळच सामंजस्यानं पाहिलं जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ह्या पुस्तकाचं पुनर्मुद्रण प्रौंढांसाठी होणं आवश्यक आहे. एकेकाळी अश्लीलतेचं बळी झालेलं हवलॉक एलिसचं ‘सायकॉलॉजी ऑफ सेक्स’ हे सप्तखंडात्मक पुस्तक आज अगदीच मंद, मर्यादांतर्गत वाटतं. फ्रॉईड वाचून आता कुणाला धक्का बसत नाही. हा काळाचा महिमा आहे. कारण विज्ञानयुगात ज्ञानाच्या कक्षा अपरिहार्यपणे वाढल्या आहेत. एखाद्या कृतीला अश्लील म्हणून किंवा अन्य साहित्येतर कारणांनी  त्याज्य ठरवलं व तिच्याशी संबंधीत असलेल्या व्यक्तींना शासन करून ती कृती लोकांच्या दृष्टीआड करून तिच्याविषयी भल्याभल्यांनी बोभाट केल्यानं ती त्याज्य होते असं नाही. कालाचा निर्णय नेहमी बदलत असतो. याचं उत्कृष्ट उदाहरण पाश्चात्य कादंबरीकार जेम्स जॉइस ह्याच्या कादंबर्‍यांचंच आहे. ‘गटार’ म्हणून सज्जनांनीही त्याकाळी वर्णिलेली ‘युलिसिस’ ही त्याची कादंबरी प्रथम मार्गारेट अँडरसन या संपादिकेनं अमेरिकेत ‘लिटल रिव्ह्यू’त प्रसिद्ध केली. खटला, दंड वगैरेंना ती कचरली नाही. यानंतर टीकाकारांचंच नव्हे तर लोकमतदेखील पालटलं. आज जोसेफ कँबेल हे अतिशय गंभीर लेखन करणारे विद्वान आपल्या ‘मिथ्स टु लिव बाय’ या ग्रंथात म्हणतात की, विसाव्या शतकातला सर्वांत प्रतिभाशाली लेखक जेस्म जॉइस असून त्याला नोबेल प्राईज मिळालं नाही. 1930 साली त्याची ‘फिनेगन्स वेक’ ही कादंबरी अनाकलनीय म्हणून निकालात काढण्यात आली. पण त्या कादंबरीची सहीसही भ्रष्ट नक्कल करणार्‍या ‘द स्किन ऑफ द टीथ’ या कादंबरीबद्द्ल थॉर्नटन वाइल्डर या लेखकाला मात्र पुलित्झर प्राईज मिळालं.

याबाबतीत राजवाड्यांची साक्षदेखील महत्त्वाची ठरते. ‘कादंबरी या निबंधात ते म्हणतात : जाज्जवल्य मनोवृत्तीशिवाय कादंबरी होणार नाही. कादंबरीकाराने समाजाची इच्छा काय आहे ते समजून घेतले पाहिजे; त्याचे स्वरूप जाणले पाहिजे. कादंबरीकार आपल्या कामाला जारीने लागला की, लहान मुलांना पशुपक्ष्यांच्या गोष्टी सांगून त्यांच्या मनात तो युक्ती व साहस ह्यांचे बीजरोपण करील; स्त्रीजनांना संसारसुखाची गुरुकिल्ली पटवील; तरुणांना राष्ट्रीय महत्त्वाकांक्षेचे रहस्य कळवील; आणि वृद्धांना आयुष्याच्या इतिकर्तव्यतेचे दिग्दर्शन करील; आणि इतकेही करून ते कसे व केव्हा केले हे कोणाला समजून देणार नाही. अशी या मयासुराची करणी आहे. युधिष्ठिराप्रमाणे ती ज्या लोकांना साधली ते लोक धन्य होत. राजवाडे कादंबरीकाराला कुठलाही अविषय नाही याबद्द्ल सांगताना, समाजातील नीतीने, वर्तनाने, विचाराने, राहणीने व दारिद्-याने गलिच्छ असा जो भाग त्याचे प्रदर्शन करणे सत्कादंबरीकाराचे काम नव्हे. असा सामान्य समज सांगून ते म्हणतात की, परंतु असा समज निसर्गाच्या विरूद्ध आहे. उजेड आणि अंधार, ईश्वर आणि सैतान, चांगले आणि वाईट, सद्गुण आणि दुर्गुण ह्या जोड्या ब्रम्ह्याने सृष्टीच्या प्रारंभापासूनच निर्माण केल्या आहेत. त्यांपैकी एकीचा निषेध कोमल मनाच्या कादंबरीकारांनी केला म्हणजे ती नाहीशीच होते असे थोडेच आहे? डोळे गच्च मिटून धरले म्हणून अस्वल अंगावर चालून यावयाचे थोडेच राहते? तेव्हा समाजातील हा जो पतीत भाग आहे, त्याच्या स्थितीचे प्रदर्शन करणे हे प्रत्येक कादंबरीकाराने आपले आद्य कर्तव्य समजले पाहिजे. श्रीमंतीत अंध झालेल्या राष्ट्रातील कादंबरीकारांना तसे वाटले तर खुशाल वाटो. परंतु हिंदुस्थानातील व महाराष्ट्रातील कादंबरीकारांना तसे वाटून परिणाम लागावयाचा नाही. ह्या देशातील दारिद्-याने गांजलेल्या, रोगाने पिडलेल्या, विद्येने मागसलेल्या सामान्य जनसमूहाचा कैवार सहृदयतेचे मूर्तीमंत पुतळे जे कादंबरीकार त्यांनी घेतला नाही तर दुसरा कोण घेईल? लोकांची खरी स्थिती लोकांच्या मनात यथास्थित बिंबविण्याला कादंबरी-सारखे दुसरे साधन नाही.

कादंबरीत अद्याप संविधानाला महत्त्व आहे. संविधानात काहीतरी मूलाधार-प्रसंग असतात किती आद्य प्रकार किंवा आ़कृतीबंध संभवतात? जर्मन कवी गटेनं असे प्रकार एकंदरीत छत्तीसच असतात असं नमूद केल्याचं आर्थर कोइस्लर ‘अ‍ॅक्ट ऑफ क्रिएशन’ या ग्रंथात  सांगतात व ते आपल्याला मान्य असल्याचंही काही उदाहरणं देऊन सांगतात. या मूलबंधाच्याच विविध पर्यायांची आवर्तनं अद्यापही कादंबरीत आढळतात. कादंबरी अजून त्यापलीकडे गेलेली नाही असं मत त्यांनी नमूद केलं आहे. हे बर्‍याच प्रमाणात खरं असलं तरी आधुनिक कादंबरी आता संविधानकाच्या साच्यातून सुटण्याचा प्रयत्न करते आहे यात शंका नाही.

शिष्ट किंवा प्रमाण अगर लेख्य भाषा हीच काय ती सौंदर्यपूर्ण व अभिव्यक्तीसाठी उचित भाषा आणि बोलीभाषा अगर ग्रामीण भाषा ही अभिव्यक्तीला कमीपणा आणणारी भाषा- असं आजही काही संस्थांच्या व्यासपीठांवरून बोललं जातं, ते पाहून आश्चर्य वाटतं. शिष्ट भाषा व बोलीभाषांचं अभिसरण साहित्यिक वातावरणाला पोषक आहे, मारक नाही. अशिष्ट भाषेचं शिष्टीकरन कसं होतं ते डॉक्टर केतकरांनी पूर्वीच सांगितलं आहे. पण शिष्ट भाषादेखील सदैव बदलत असते. चिपळूणकरांचं मराठी त्याकाळी अत्यंत सुंदर होतं. पण आज ते पुरं पडणार नाही व तेवढ आकर्षकही वाटत नाही. पोषाखाप्रमाणे भाषादेखील सतत बदलत असते. बदल हाच भाषेचा स्वाभाविक धर्म आहे. भाषा अनुभवाला अनुसरते आणि अनुभव तर सतत वेगवेगळ्या रूपांत येत असतो.

परंतु शिष्टाचाराप्रमाणे शिष्ट अगर प्रमाणित भाषा उचलण्याकडेच लोकांचा कल असतो. बोलभाषेत कितीही लिहलं आणि प्रमाणित भाषेनं लोकभाषा कितीही आत्मसात् केली तरी जिथं असंदिग्ध, विदग्ध आणि शास्त्रीय अभिव्यक्ती लागते, तिथं प्रमाणित भाषाच काय ती उपयुक्त होते व ती टिकूनही राहते. शास्त्रीय वाङ्मय तर याच भाषेवर जगभर अवलंबून आहे. त्याला पर्याय नाही. लोकांच्या ज्ञानाची कक्षा वाढते तसं प्रमाणित वाङ्मय लोकांना दूरचं किंवा सोवळं वाटत नाही. शास्त्रकाराला तर काहीच परकं नसतं. नाटक, कथाकादंबर्‍या व कवितांत मात्र बोलभाषेचा वापर अधिक वास्तवपूर्ण व प्रत्ययकारी होतो यात शंका नाही. परंतु एवढं मात्र खरं की, भाषेचे हे दोन स्तर परस्परपूरक आहेत. विज्ञान आणि साहित्य यांचे संबंध अतूट असायला हवेत. कारण विज्ञाअन नवी क्षितिजं स्पर्शीत आहे आणि सर्व तर्‍हेच्या साहित्यात नवी क्षितिजं यावीत ही आजची प्रथमिक गरज आहे. मानवाच्या भवितव्याची चाहूल या जाणिवेतूनच लागायची आहे. धर्मात श्रद्धा मूलभूत असते. धर्मानं आजवरच्या साहित्याला प्रेरणा दिली आहे. त्याची जागा विज्ञान घेईल काय असं अनेकांना वाटतं. पण तसं पाहिलं तर विज्ञानातदेखील श्रद्धा असतेच. विज्ञानाचा हेतू श्रद्धामयता नसतो हे खरं असलं तरी सत्यावाचून धर्म, कला, विज्ञान नाही-तसंच साहित्यही नाही. विज्ञानात वैश्विक दृष्टी अभिप्रेत असते. ते प्रासंगिक व प्रादेशिक नसतं. साहित्यात भाषाच ठरीव लोकसमूहाछी प्रातिनिधिक असल्यानं ते सदैव प्रादेशिक पोषाख घालून बसलेलं दिसतं. पण त्यातली ती मर्यादा त्याच्यातल्या वैश्विक दृष्टी ठेवून लेखन करतो, तोवर ते लेखन योग्य दिशेनंच वाटचाल करतं व योग्य तो परिणाम साधू शकतं.

विज्ञानाच्या विकासाबरोबर मानवाच्या अहंकराला हादरे बसू लागले. कोपर्निकसनं प्रथम आपल्याला जाणीव करून दिली की, मानव काही विश्वाचं केंद्र नव्हे. दुसरा हादरा मानावाचा अनुल्लंघनीय पाशवी अविष्कार दाखवून डार्विननं दिला. मानवाचं आस्तित्व भविष्यकाळी लोप पावण्याचा संभव असल्याचं त्यानं दाखवन दिलं. आणि फ्रॉइडनं तर जबरदस्त तडाखा हाणला. मानवी अहंकाराला त्यानं दाखवून दिलं की, ‘बाबा, ज्या मनोभूमित तू राहतोस, तिच्यात क्षणोक्षणी घडणार्‍या गतिशील हालचालींचं-ज्या हालचालींवर तुझी नियती अवलंबून आहे-तुला यत्किंचितदेखील ज्ञान नाही.’

तेव्हापासून माणूस आपले मनोव्यापात भयग्रस्त होऊन तपासू लागला. ही भाराक्रांत अवस्था पाश्चात्य कादंबरी-वाङ्मयात फ्रॉइडमुळेच आविर्भूत झाली. एकोणिसाव्या शतकातल्या कादंबरीशी नव्या कादंबरीचं कुठंच जुळत नाही. तसं पाहिलं तर ही नवी कादंबरी जुन्या ठसठसीत कादंबर्‍यांप्रमाने मनोरंजक नसते. तिला संविधान नसतं. विश्लेषण मात्र भरपूर असतं. ह्या कादंबरीच्या मानसशास्त्रीय बैठकीमुळे सवंग लोकप्रियता हे बाह्य मूल्य आपोआपच  तिच्यापासून दूर राहू लागलं. आणि काही अस्वस्थतेचा शोध घेणार्‍यांनाच तिच्यातलं मूल्य ओळखता येऊ लागलं. आपल्याकडेही केंद्र हरवलेल्या माणसाची चित्रण आता कुठं सुरू होऊ लागली आहेत. भाऊ पाध्ये, चिं. त्र्यं खानोलकर, जयवंत दळवी वगैरे लेखक असा प्रयत्न करताहेत. पण जून त्यांच्या कृती यशस्वी होण्याइतकं सामर्थ्य त्यांच्यात आलेलं नाही. अनेक लेखक जेव्हा नव्या प्रवाहात स्वतःला  झोकतात, तेव्हा एखाद्यालाच कालांतरानं सिद्धी प्राप्त होते. कारण मनुष्य काय आहे आणि मानव्य अंगी येणं म्हणजे काय आहे हे दोन प्रश्न, विल्यम सॅडलर ‘एक्झिस्टन्स अँड लव’ या ग्रंथात म्हणतात त्याप्रमाणे, आताच्या लेखकांपुढे येत राहतात. सामाजिक मानसशास्त्राच्या आधारे आता आपण मानवप्राणी आणि त्याच्या जीवनाचं उद्दिष्ट यांचा विचार करायला उद्युक्त होत आहोत.

माणसा-माणसांतले परस्परसंबंध, क्रिया-प्रतिक्रिया, प्रेरणा आणि उद्गार यांच्यातली नवी नाती आपण नव्यानंच हुडकतो आहोत. तत्त्वज्ञानदेखील एक शास्त्रच आहे. मानवाच्या ध्येयसृष्टीविषयी, त्याच्या वैयक्तिक आणि समष्टियुक्त जीवनातल्या सुसंगती आणि विसंगतींबद्दल  हे शास्त्र आपल्याला नव्या वाटा दाखवतं आहे.

नवी क्षितिजं निर्माण करण्याची आत्यंतिक गरज आज विज्ञान आपल्याला पटवून देतं आहे. कुठल्याही लेखकाला आपापल्या विषयाचं शास्त्रीय आकलन काही प्रमाणात तरी असल्याशिवाय त्याचं आज निभणार नाही. वैज्ञानिक कथाकादंबर्‍यांची आज नितांत गरज आहे. दि. बा. मोकाशी, नारायण धारप वगैरेंनी अशा स्वरूपाच्या काही कथा दिल्या आहेत. त्या सद्यःपरिस्थितीत आपण स्वीकारतोच आहोत आणि असे प्रयत्नही होतील तेवढे व्हायलाच हवेत. परंतु मराठीत वैज्ञानिक कथेचं खरंखुरं क्षितिज जर कुणी प्रथमच खोललं असेल तर ते डॉक्टर जयंत नारळीकरांनी. ते स्वतः विश्वविख्यात वैज्ञानिक आहेत. त्यांचं मी स्वागत करते आणि त्यांना मनःपूर्वक यश चिंतिते. ‘द इल्यूजन’मध्ये डेव्हिड काउटे म्हणतात, “आजच्या लेखनाचं वैशिष्ट्य हे की उद्गारपूर्व अनुभव, ‘मी’-च्या जाणिवेपूर्वीचा अनुभव शब्दांकित करण्याचा प्रयत्न. ‘मी’ला आपल्या साक्षित्वाची अगर भावनांची जाणीव होण्यापूर्वीचा हा क्षण असतो.” दुर्बोधता इथं अटळ असते. आक्षेप येण्याचा संभवही खूप असतो. रंजकतेपासून हे साहित्य दूर असतं.

पण वास्तवाची पकड ते सोडीत नाही. वास्तव म्हणजे काय तर तपशिलातला सत्यपणा, आणि प्रातिनिधिक आणि वैशिष्ट्यपूर्ण प्रसंगातलं सत्य चित्रण. हे करायचं तर लेखकाचा मानसशास्त्राशी चांगलाच परिचय हवा. कथाकादंबरी वाङ्मयात-अगर चरित्रलेखनातही-पात्रांचे व्यवसायानुसार व स्वभावानुसार ठसेच बनत असतात. विसाव्या शतकात दुभंग अगर भग्न व्यक्ती दाखवण्याची प्रथा बळावलेली आहे, यात शंका नाही. माणूस माणसाला कणाकणांनी हुडकतो आहे. नि समग्र मानव त्याला आढळत नाही. पूर्ण मानव कसा असावा याची कल्पना नसली तरी त्याला अपेक्षा त्याला आहे. मग पुरातन काळातले आदर्श तो घेतो, त्यांत नवे नमुने करतो. कधी लहान आणि अपवादांनीच गांजलेल्या लहानांनाच तो मोठं परिमाण देतो किंवा चक्क अ-नायक उभे करतो. भग्न व्यक्तित्वाचे ठसे आपल्या कथाकादंबर्‍यांत नुकते नुकतेच रुजू घातले आहेत. खानोलकरांची सर्वच पात्रं लैंगिक विकृतीनं पछाडलेली आढळतात. या पात्रांतल्या विकृती निसर्गनिर्मित असतात. जयवंत दळवींची पात्रं अनेकदा परिस्थिती-निर्मित असतात. ‘स्वगत’ ही कादंबरी त्याचं उत्कृष्ट उदाहरण आहे. आता तर त्यांनी सार्‍या अर्धवट अगर पूर्ण वेड्यांच्याच दुःखपूर्ण जाणिवा-नेणिवा रेखाटल्या आहे. विजय तेंडूलकर आपल्या नाटकांत लैंगिक हिंसाचार दाखवतात. अर्थात ह्या कुठल्याही कृतींना अद्याप ते-ते माणसाचे उत्कृष्ट नमुने बनवून कथेला समाधानकारक कलाकृतीचं स्वरूप देता आलेलं नाही. अजून आमचे लेखक चाचपडत चालले आहेत. असे नमुने कलापूर्ण करायला कालावधी लागतो, व सामुदायिक जाणदेखील लागते. ‘मला प्रेमकथा लिहिता आली नाही, कारण प्रेमाची भाषा अद्याप मराठीत घटलेली नाही’ असं डॉक्टर केतकर म्हणायचे. सराईत दृष्टीखेरीज निर्मिती होत नाही हे सत्य आहे. परंतु काही स्वभाववैशिष्ट्यांबद्द्ल या मंडळींचा अंदाज चांगलाच लागला आहे यात शंका नाही.

पण राजकीय कादंबरीत मात्र अद्यापि कामगार चळवळीखेरीज दुसरं कथानक क्वचितच येतं. स्वतंत्रपणे राजकारणाचं शास्त्र जाणल्याखेरीज आणि अशा जटिल पार्श्वभूमीवर राजकारण्याचं चित्र रेखाटताना त्याच्या स्वभावचा केंद्रबिंदू कुठला, हे अद्याप आमच्या कादंबरीकाराला अगर नाटककाराला व्यवस्थित उमगलेलं दिसत नाही. पाश्चात्य कादंबरीत ते तंत्र बरोबर बसून गेलं आहे. मानसशास्त्राची गहन प्रमेयं तिथल्या लेखकांनी अवगत केल्यानं त्यांना राजकारणी पात्राची उभारणी तिथल्या पार्श्वभूमीवर मुक्तपणे रंगवता येते.

अँथनी स्टोर यांनी ‘द डायनॉमिक्स ऑफ क्रिएशन’ मध्ये अशा माणसाची मनोभूमी विशद केली आहे ती अशी : महत्त्वाकांक्षी माणसं असतात त्यांना कामाशिवाय घटकाभरदेखील राहता येत नाही. त्यांना रिलॅक्सेशन माहीतच नसतं. त्यांना वैयक्तिक संबंधांकडे लक्ष द्यायलाही फावत नाही. कलावंतापेक्षा मुत्सद्दी आणि उद्योगपती यांच्यात या प्रवृत्ती अधिक असतात असं सायकिअ‍ॅट्रिस्ट्सना आढळून आलं आहे...राजकारणी पुरुष जागा असलेला सर्व वेळ कार्यात व्यग्र असतो...ज्यांना सारा वेळ काम करीत रहायची मानसिक गरज असते, त्यांना राजकारणाचं जीवन आदर्श असतं. राजकारणी माणसं अंतर्गत सुरक्षिततेच्या जाणिवेमुळेच सत्ता काबीज करायला बघतात. व्यक्तिगत संबंधांतून पोसलं जाणारं आत्मभान बाजूला सारून त्याच्याजागी ते बाह्य कार्यव्यापृततेचा वापर करतात.

आता आपल्याकडे राजकारणी पुरुषाच्या या मुख्य वैशिष्ट्याचीच जाण नसल्यामुळे अगर असल्यास ती प्रकट करणं सोयिचं नसल्यामुळे ,शिवाजी, माधवराव पेशवे ते टिळक यांच्यापर्यंत केवळ ढोबळ व्यक्तिपूजेसाठी कादंबरीनिर्मिती झाली आहे. राजकीय हालचालींचा व व्यक्तींचा यथातथ्य मागोवा घेणार्‍या चरित्रात्मक वाङ्मयाची आपल्याकडे वाण आहे. तरी आता ती भरून निघण्याची सुचिन्हं कुठं कुठं दिसत आहेत. उदाहरण वि. श्री. जोशी यांनी लिहिलेया वासुदेव बळवंत व चाफेकर बंधूंच्या चरित्रांचंच आहे. आता कुठल्याही कादंबरीकाराला लेखन करायला हा कालखंड उपलब्ध झाला आहे. राजकीय व्यक्तीच्या चित्रणाकडे वरील शास्त्रपूत दृष्टिकोनातून पाहिल्यास आता राजकीय माणसाचा असा नमुनाही सद्यःपरिस्थितीत लेखनावर बंधनं आलेली असताना लेखकाला करता येत नाही. राजकारणाच्या चर्चेची समस्त दालनंच बंद झाल्यावर व्यक्तिचित्रण कुठलं? डोळ्यांसमोर घडणार्‍या घटनांना आम्ही साहित्यबद्ध करू शकत नाही. साहित्याची ही अपरिमित हानी आहे. आधी विसावं शतक मागच्या सर्व शतकांपेक्षा मानवाला अधिक उत्तेजित करणारं, क्षोभांनी भरलेलं शतक आहे. ज्ञानाची क्षितिजं हरघडी रूंदावताहेत. हिंसाही वाढते आहे. जग एकत्रित होऊ पाहतं आहे आणि देशांची शकलंही पडताहेत. त्याचे परिपाक डोळ्यांसमोर आहेत. पण त्यांचं वर्णन सत्ताधीशांच्या केवळ गुणगौरवाखेरीज आपल्याला करता येत नाही. ही अपरिमित हानी आहे. आत्ताच कुठं आमचा लेखक विविध क्षेत्रांतल्या लहानमोठ्या घटना व व्यक्ती यांना अपुर्‍या ज्ञानानं का होईना पण चापसून पाहू लागला होता. राजकारणाला हात घालावा असं आता आताच कुणाच्या क्वचित मनात येत होतं. गंभीर वृत्तीनं राजकारण्यांकडे बघावं हे कुतूहल निर्भर होतं. त्याच सुमारास बंधनं आली की विचारांचा ओघच खंडित होतो. नुकतंच ऐकलं की विजय तेंडूलकर व जयवंत दळवी यांची  राजकीय समस्यांना किंचित स्पर्श करणारी नाटकं अडकून पडली आहेत.

मानवाला अनेक दुःख भोगावी लागतात. अनेकांची दुःखी मुकी पण खोल असतात. त्यांचा वाचा देणं हेच साहित्यिकांचं कार्य असं काम म्हणतो. परंतु आपल्याकडे साहित्यिकांनी अशा प्रचंड दुःखांना वाचा पुरवली नाही. त्यांना वाचा दिली ती महात्मा गांधींनी व तीही राजकीय पार्श्वभूमीवर. तेव्हापासून आमच्याकडे राजकारण आणि साहित्य ह्यांचं कार्य अतूट झालं आहे. म्हणूनच साहित्य हे आता राजकारणापासून तोडता यायचं नाही. परस्परसंबंध व सामंजस्य हे दोन गुण अशा साहित्याचं व्यवछेदक लक्षण समजले पाहिजेत.

तेव्हा सांगायचा मुद्दा असा की, भारतातल्या लेखकाला जगण्यासारखी परिस्थिती अजून आलेली नाही बहुसंख्य लेखकांना जगण्यासाठी दुसरे साहित्येतर उद्योग करणं भाग पडतं. हे तर मोठंच बंधन त्यांच्यावर कायमचं आहेच. ते पत्करल्यावर आपल्या चिमुकल्या विश्वात त्यानं आणखी काही बंधनं लादून घेणं उचित नाही. तसं झालं तर त्यांच्या अस्तित्वाचाच लोप होईल. मराठी लेखकांना मी काय संदेश देणार? संदेश तर दरिद्री संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी पूर्वीच दिलेला आहे. शिवाजी महाराजांसारख्या लोकोत्तर राजानं भेटीला या असं म्हटलं तेव्हा त्यांनी जे म्हटलं, तोच संदेश आम्ही शिरोधार्य मानावा -

तुम्हांपाशी आम्ही येऊनियां काय।
वृथा सीण आहे चालण्याचा॥

सतराव्या शतकात तुकाराम महाराजांनी सांगितले त्याच तर्‍हेचे विचार विसाव्या शतकातदेखील उमटल्याशिवाय राहिलेले नाहीत. पण त्यांची दिशा वेगळी आहे. मानवी सामाजिक प्रतिष्ठा माणसाच्या कामी येत नाही, थोरामोठ्यांपुढे धावून माणसाला फारसं गाठता येत नाही, असा अनुभव आधुनिक विचारवंतांनी घेतला आहे. आता तुकारामासारखा संदेश देणं लेखकाला परवडणारं नाही, नीत्शेनं मानवाचं एकटेपण अटळ आहे हा शोकसूचक सूर काढला.त्याचेच सादपडसाद माणसाच्या एकलेपणाच्या विविध स्वरूपांच्या निर्मितीत उमटलेले दिसतात. पूर्णपुरुष कृष्ण आज आम्हाला उपयोगी पडायचा नाही हे मी याच अर्थानं म्हटलं होतं. हा माणूस कितीही गुणी असला तरी त्याची धडपड त्याचं एकटेपण घालवू शकत नाही. मानसशास्त्रज्ञांनी माणसाच्य मनाचे जे गूढ खेळ आहेत, ते याच पार्श्वभूमीवर चितारलेले आहेत. आधुनिक लेखक माणूस इतका हिंस्त्र, दुबळा स्खलनशील का दाखवतात-या प्रश्नाचं उत्तर या पार्श्वभूमीतच सापडतं.

शोकात्मतेच्या अटळतेचा भाव आधुनिक वाङ्मयाचं एक प्राणभूत तत्त्वच झालेलं आहे. हे निर्मितीचं बीज आहे. माणसाच्या नियतीतच विनाश आहे ही दुःखपूर्ण जाणीव हाच विसाव्या शतकातल्या साहित्याचा स्थायी भाव आहे. या स्थायी भावामुळे माणूस अलिप्त आहे आणि तो स्वतःची धरणा मूल्यमापनासाठी वापरतो हे दिसून येतं. रवींद्रनाथांनीदेखील ‘एकला चलो रे’ असं म्हटलं आहे, ते उगीच नव्हे.

या सर्वांतून एक गोष्ट प्रतीत होते ती अशी की जो निर्माणकार आहे, त्याला निर्मितीसाठी एकटंच जाणं प्राप्त होतं. त्याची व्यथा, वेदना, शोक सारं काही त्यालाच सोसावं लागतं. जीवनातल्या संकटांबरोबर झुंजताना तडजोड त्यानं केली तर कदाचित् भौतिक स्वास्थ्य त्याला मिळेल. कदाचित् मानसिक निर्धास्तपणा मिळेल. पण निर्मिती कोंडून त्याला सुख निश्चित मिळणार नाही आणि मोठ्या श्रेयाला तो मुकेल. पुढच्या पिढ्यांच्या भवितव्याचीच हानी तो करील.

Featured post

सेक्स, धर्म, गुलामगिरी आणि इस्लमिक स्टेट

प्रस्तावना : Sex विषयी भारतीयांची मानसिकता अजून बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतात मोकळेपणाने अजूनही सार्वजनिक ठिकाणी बोलले जात नाही....