आयुष्यातल्या
अनेक श्रद्धास्थानांपैकी
‘गुलज़ार’ हे
एक श्रद्धास्थान
आहे.
आर्.
डी.
बर्मन आणि
किशोर कुमार
प्रमाणेच गुलजार
हे नाव
सुद्धा इतकं
‘आपलं’ वाटतं
की गुलज़ारचा
उल्लेख ‘अरे-तुरे’च
येतो. या ‘अरे-तुरे’मध्ये
कोणत्याच प्रकारचा
अनादर नाही.
हा
‘अरे-तुरे’ आपलेपणातून,
प्रेमातून येतो.
गुलज़ार हा
माणूस आयुष्याच्या
इतक्या जवळ
वाटतो, प्रेमाचा वाटतो. १८ ऑगस्ट रोजी
ह्या गुलज़ारचा
८१ वा
वाढदिवस आहे.
त्याचा जन्म
कधी झाला,
त्याचा पहिला
चित्रपट कोणता
असल्या गद्य
तपशिलांमध्ये मला
पडायचं नाही.
ती माहिती
विकीपीडियावर मिळेल
की.
एखादा माणूस
आपला वाटण्याची
कारणे ही
विकिपीडियावरच्या माहितीत
मिळत नाहीत.
ती अनुभवावीच
लागतात. अजून एक प्रांजळ
कबुलीजबाब. मला संपूर्ण गुलज़ारचं
आयुष्य अथ
पासून इति
पर्यंत माहीत
नाही. जे मला आवडलं,
जे भावलं
तेवढच मला
‘गुलज़ार बद्दल’
माहिती आहे.
फाळणीचा
अभ्यास करताना
मला एक
गोष्ट जाणवली
ती म्हणजे
फाळणी ही
केवळ एका
देशाची फाळणी
नव्हती, केवळ काही लाख
माणसे मृत्युमुखी
पडली, इतक्या स्त्रियांवर बलात्कार
झाले, इतकी माणसे बेघर
झाली या
आकडेवारीने फाळणी
कळणार नाही.
एकेका माणसाच्या
वैयक्तिक गोष्टी
वाचल्या म्हणजे
फाळणीने काय
परिणाम केले
हे वाचले,
पाहिले तर
फाळणीचे घाव
किती गंभीर
होते हे
लक्षात येईल.
वैयक्तिक गोष्टी
वाचल्या म्हणजे
फाळणी काय
होती हे
लक्षात येते.
फाळणीबाबत मन
हेलावून टाकणारी
एक गोष्ट
सांगितली जाते.
फाळणी झाल्यानंतर
पाकिस्तानातून भारतात
आलेले निर्वासित
दिल्लीजवळ रहात
होते. अशा एका निर्वासितांच्या तंबूला भेटायला जवाहरलाल
नेहरू गेले
होते. त्यांच्याबरोबर त्यांची कन्याही
होती. त्या तळावर एका
माणसाने इंदिरा
गांधींचा हात
पकडला. अर्थात विनयभंगाचा प्रयत्न
केला. ह्या कृत्यावर नेहरू
प्रचंड चिडले.
राजबिंडे, गोरेपान नेहरू लालबुंद
झाले, ते पाहून तो
मनुष्य नेहरूंना
म्हणाला की,
‘तुमच्या मुलीचा
मी केवळ
हात पकडला
तर तुम्हाला
इतका राग
आला.
आमच्या स्त्रियांबरोबर काय काय झाले
याची तुम्हाला
कल्पना आहे
का?’
असे कधी
भरू न
शकणारे फाळणीचे
घाव आपल्याला
गुलज़ारच्या कथांमधून
दिसतात. गुलज़ारने लिहिलेले दोन
लघुकथा संग्रह
‘रावीपार’ आणि
‘देवढी’. या
इंदिरा गांधी-नेहरु प्रसंगाप्रमाणे असे अनेक प्रसंग
रावीपारमध्ये आहेत.
ब्रिटिश भारताच्या,
आत्ताच्या पाकिस्तानातील
पंजाब प्रांतातील
झेलम जिल्ह्यात
या
‘संपूर्ण सिंह
कालरा’चा
जन्म झाला.
लाखो भारतीयांप्रमाणे,
मिल्खा सिंग
प्रमाणे, खुशवंत सिंगांप्रमाणे गुलज़ार
फाळणीनंतर निर्वासितांच्या तंबूमध्ये रहात होता.
या एका
गुलज़ारसाठी दुःखद
आणि रसिकांसाठी
सुखद कारणांनी
गुलज़ारच्या लिखाणात
सजीवता आहे.
ते भावण्याचे
मुख्य कारणच
आहे की
गुलज़ारच्या कथा
या स्वानुभवातून
लिहिल्या गेल्या
आहेत.


हा झाला ‘कथाकार’
गुलज़ार. आता कवी गुलज़ार. त्याच्या आधी, गुलज़ार एक चित्रकार.
उर्दू
भाषेतला सर्वश्रेष्ठ
शायर गालिब.
या गालिबचे
गुलज़ारने चरित्र
लिहिलेले आहे.
पूर्वी दूरदर्शनवर
लागणारी ‘मिर्झा गालिब’ या
मालिकेची पटकथासुद्धा
गुलज़ारनेच लिहिलेली
आहे.
‘मिर्झा गालिब’
हा अतर्क्य
माणूस सहसा
न समजणारा माणूस गुलज़ारने
सोपा करून
दाखवला.
कवी
म्हणून गुलज़ारचं
मला वाटलेलं
वैशिष्ट्य आणि
वेगळेपण. आपल्या मराठीत चार
ओळींच्या कवितेला
चारोळी म्हणतात
आणि तीन
ओळीच्या कवितेला
त्रिवेणी. केवळ तीन ओळींत
भावना आणि
त्यामागचा आवेग
गुलजारने लिहिलेल्या
त्रिवेणीत आला
आहे.
गुलज़ारच्या त्रिवेणीचे
वर्णन असे
केले जाते
- या अल्पाक्षरी
कवितेत पहिल्या
दोन काव्यपंक्तींचाच गंगा-यमुनेप्रमाणे संगम
होऊन कविता
पूर्ण होते.
मात्र तिसरी
ओळ या
दोन प्रवाहांखालून
सरस्वतीप्रमाणे गुप्तपणे
वाहते. त्रिवेणी हा काव्यप्रकार
गुलजारच्या प्रतिभेचा
नवा आकृतीबंध
आहे.
गुलजारने लिहिलेल्या
या त्रिवेणीचा
‘शांता शेळके’
यांनी मराठी
अनुवाद केलेला
आहे.
ही एका
गुलज़ारची त्रिवेणी...
(मराठी अनुवाद)
उडून जाताना पाखराने फक्त इतकेच पाहिले,
किती तरी वेळी फांदी हात हलवत होती
किती तरी वेळी फांदी हात हलवत होती
निरोप
घेण्यासाठी? की
पुन्हा बोलावण्यासाठी?
आता गुलज़ारची गाणी. चित्रपटांमधील
अजरामर गाणी. चित्रपटांमधल्या गुलज़ारच्या गाण्याचा विचार
करताना मला
आर्.
डी.
बर्मन आणि
किशोर कुमार
शिवाय गुलज़ारचा
विचार करताच
येत नाही.
या तिघांनीही
एकमेकांचं सोनं
केलयं असं
म्हणूया. गुलज़ारच्या असामान्य प्रतिभेचे
काही निवडक
तीनचार चित्रपट.
आँधी, इजाज़त, परिचय, घर, मासूम... मौसम. आँधी, इजाज़त, मौसम इ.
चित्रपटांच्या पटकथासुद्धा
गुलज़ारने लिहिलेल्या
आहेत.
‘तेरे
बिना ज़िंदगी
से कोई’
किंवा ‘मेरा कुछ सामान’, ‘आनंद’ चित्रपटातील
सर्व गाणी.
मौसम मधलं
‘दिल ढूंढता
है,
फिर वही’
हे गाणं.
ही यादी
संपणारी नाही.
सुरुवातीला एक
गोष्ट सांगून
मग मला
क्लासिक गाण्यांकडे
येऊ दे.
पण या
लेखाचे शीर्षक
हे देण्याचे
कारण म्हणजे
‘जंगल जंगल
बात चली
है,
पता चला
है’ पासून
‘बीडी जलैले’
ते
‘कजरा रे
कजरा रे’पर्यंतची गाणी
गुलज़ारची आहेत.
हा कॅनव्हास
बघा किती
प्रचंड आहे.
आत्ताच्या ‘जब तक है
जान’ आणि
‘कमीने’ मधील
सुद्धा गाणी
गुलज़ारनेच लिहिलेली
आहेत. २० पेक्षा जास्त
वेळा ‘फिल्मफेअर’
पुरस्कार. साहित्य अकादमी, दादासाहेब फाळके, पद्मभूषण आणि ग्रॅमी
पुरस्काराने गुलज़ारना
सन्मानित करण्यात
आले आहे.
मला हे
अगदी मान्य
आहे ही
माहिती गद्य
आहे.
गीतकार
म्हणून गुलज़ार
आवडण्याची कारणे.
आनंद मधले
गाणे आहे.
‘मैने तेरे
लिये ही
सात रंग
के सपने
चुने’ मुकेशच्या
गोड,
निरागस आवाजात
गुलज़ारचे हे
गाणे आहे.
किनारा मधले
- ‘मेरी आवाज़
ही पेहेचान
है अगर
याद रहे’
किंवा ‘जाने क्या सोचकर
नही गुजरा
एक पल
रात भर
नही गुजरा’. अर्थात शब्द
भिडणारे आहेतच
पण शब्दांमधली
आर्तता आर्.डी.च्या संगितातूनही
व्यक्त होते.
‘घर’ चित्रपटातले
‘फिर वही
रात है’
किंवा ‘कोई होता जिसको
अपना’. अशी
किती गाणी
सांगावीत? आँधीमधल्या गाण्यांशिवाय, इजाज़त
मधल्या गाण्यांशिवाय
गुलज़ार पूर्णच
होऊ शकणार
नाही. तश्या तर असंख्य
गोष्टी आहेत,
त्यांच्याशिवाय गुलज़ार
अपूर्ण राहील.
एकच उदाहरण
देतो माचिस
चित्रपटाचे. त्यामध्ये
एक डायलॉग
आहे.
फाळणीने उद्ध्वस्त
झालेल्या एका
माणसाच्या तोंडी
‘आये ४७
मे,
मारे गए
आधे ८४
मे,
अब किसके
लिए जिना.’
पण माझ्यासाठी
आँधी आणि
इजाज़त मधली
गाणी म्हणजे
संजीवनी देणारी
आहेत. कधी उदास निराश
वाटत असले
तर ही
गाणी फ्रेश
करतात.
इस
मोड से
जाते है
कुछ सुस्त
कदम रस्ते,
कुछ तेज़
कदम राहें,
पथ्थर
की हवेली
को शीशे
के घरोंदो
मे,
तिनको के
नशे मन
तक,
इस मोड
से जाते
है ॥
किंवा
तुम
आ गये हो,
नूर आ
गया है,
नही
तो चरागोंसे
लौ जा
रही थी।
मला
आवडणारे गाणे
म्हणजे, केवळ गुलज़ारच नव्हे,
केवळ आर्.डी.च नव्हे, केवळ किशोर कुमार, लता मंगेशकरच
नव्हे. सर्वात जास्त आवडणारे
गाणे ‘तेरे बिना जिंदगी
से कोई’
आणि त्यातले
सुद्धा शेवटचे
कडवे. ‘जी मे आता
है,
तेरे दामन
मे सर
छुपाके हम
रोते रहे,
रोते रहे।’
या गाण्यावर
पुन्हा काही
भाष्य करावे
इतनी अपनी
औकात नही।
इनके सिर्फ
अल्फाज़ही काफी
है। असेच
इजाज़त मधले
सुद्धा. खरं सगळा इजाज़त
हा चित्रपटच
असामान्य आहे.
सगळी स्टार
कास्ट, पटकथा, गीत,
संगीत, पार्श्वगायक सगळेच बेस्ट.
पण गुलज़ार
बद्दलचे लिखाण
‘मेरा कुछ
सामान’ शिवाय
पूर्ण होणार
नाही. नासिरुद्दीन शहाच्या प्रेयसीचे
नासिरुद्दीन शहाच्या
म्हणजे शहाच्या
हिरोच्या घरी
काय काय
राहिले आहे
हे प्रेयसी
कवितेतून पाठवते.
‘सावन के
कुछ भीगे
भीगे दिन
रखे है।’ ‘और मेरे
इक खत
में लिपटी
रात पडी
है’ एक
अकेली छत्री
मे जब
आधे आधे
भीग रहे
थे,
आधे सूखे
आधे गीले
- सुखा तो
मै ले
आयी थी,
गिला मन
शायद बिस्तर
के पास
पडा हो,
वो भिजवा
दो मेरा
वो सामान
लौटा दो.
या अजरामर
गाण्याबद्दल आपण
वेगळे काही
बोलू नये.
जे काय
बोलायचे आहे
ते गुलज़ार
बोलला आहे.
आपण फक्त
ऐकायचे. डोळ्यातून पाणी आले
तर येऊ
द्यायचे. भावनांचा आवेग असह्य
झाला तरच
ते होत
असत.
ती ताकद
गुलज़ारच्या लिखाणात
आहे.
कथेत आहे,
त्रिवेणीत आहे,
गीतात आहे.
शेवटची गुलज़ारची एक कविता :
मै कभी
सिगरेट पिता
नहीं, मगर हर आने
वाले से
पूछ लेता
हूँ की
माचिस है?
बहुत कुछ
है जिसे
मैं फूँक
देना चाहता
हूँ
No comments:
Post a Comment